Join us

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या प्रेमात पडले होते संजय लीला भन्साळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 4:18 PM

संजय लीला भन्साळी यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी अर्धवट राहिली. त्यांच्या लग्नाची तयारी देखील झाली होती पण हे प्रेम काहानी अपूर्ण राहिली.

हम दिल दे चुके सनम','रामलीला','बाजीराव-मस्तानी' असे एकाहून एक सरस चित्रपट बॉलिवूडला देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीत  त्यांचं नाव प्रथम क्रमांकावर घेतलं जातं.   ज्या प्रमाणे संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येतात. तुम्हाला माहित आहे का त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी अर्धवट राहिली. त्यांच्या लग्नाची तयारी देखील झाली होती पण हे प्रेम काहानी अपूर्ण राहिली. 

 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री असे अनेक पुरस्कारही त्यांच्या नावावर होते. त्यांना आयुष्यात सर्व काही मिळवले, परंतु ते प्रेमात  अयशस्वी ठरले. संजय लीला भन्साळी  कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या प्रेमात पडला होते. बी-टाऊनमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती, पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि संजय आणि वैभवची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

संजय लीला यांनी 1999 मध्ये 'दिल दे चुके सनम' हा चित्रपट करत होते. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्याच्या जोडीने धमाल केली होती. या चित्रपटातून वैभवी मर्चंटने तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्याची कोरिओग्राफी तिने केली होती. याच सेटवर संजय लीला भन्साळी आणि वैभवी यांच्यात मैत्री झाली आणि प्रेमाचे किस्से सुरू झाले.

पण 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'सावरिया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये सर्व काही बदलले. दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या बातम्याही आल्या, पण नंतर त्या अफवा ठरल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय भन्साळी आणि वैभवी मर्चंटमध्ये बरेच मतभेद होते. दोघांच्याही लक्षात आले की त्यांच्यात इतके घट्ट नाते नाही की ते लग्नापर्यंत पोहोचू शकेल. या कारणावरून दोघांनी परस्पर संमतीने माघार घेत आपलं नात्याला पूर्णविराम दिला. 

टॅग्स :सेलिब्रिटी