शाहरुख खान (shahrukh khan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. गेली अनेक वर्ष शाहरुख खऱ्या अर्थाने बॉलिवूडवर राज्य करतोय. शाहरुखच्या अभिनय कारकीर्दीची जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा शाहरुखचं घर 'मन्नत'ची असते. शाहरुखचं घर 'मन्नत' खूप आलिशान आहे. शाहरुखच्या 'मन्नत'चं आकर्षण इतकं आहे की, जगभरातील शाहरुखचे चाहते 'मन्नत' बघण्यासाठी येतात. अशातच 'मन्नत'मध्ये शाहरुखने एक खास नियम केलाय. तो म्हणजे घरात फोनवर बोलण्यास बंदी आहे. काय आहे यामागील कारण?
'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास बंदी कारण...शाहरुख खानने 'मन्नत'मध्ये एक खास नियम केलाय. कुटुंबाची प्रायव्हसी लक्षात ठेऊन 'मन्नत'मध्ये शाहरुखने फोनवर वापरण्यास बंदी आहे. संपूर्ण परिवाराला एकमेकांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी शाहरुख आणि गौरीने घरी असताना कमीत कमी फोन वापरण्याचा नियम आखलाय. त्यामुळे घरात असताना शाहरुख स्वतः फोनवर बोलण्यास टाळतो. कुटुंबाच्या वैयक्तिक वेळात कोणीही बाधा होऊ नये, हा यामागे उद्देश आहे. याशिवाय मुलांनी प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि पारंपरिक मूल्य त्यांनी जपावी म्हणून 'मन्नत'मध्ये श्रीगणेश, लक्ष्मींच्या मुर्तींसोबत कुराण असलेलं दिसून येतं.