Join us  

जया यांनी विचारलेल्या 'या' प्रश्नामुळे संतापले होते बिग बी; चारचौघांत केला होता पत्नीचा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:28 PM

Amitabh bachchan: भर पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जया यांचा अपमान केला. ज्यामुळे उपस्थित सगळेच थक्क झाले होते.

बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून जया बच्चन (jaya bachchan) आणि अमिताभ बच्चन(Amitabh bachchan) . आजवरच्या कारकिर्दीत या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. त्यामुळे ते बऱ्याचदा त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात.  सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. एकदा अमिताभ बच्चन यांनी भर कार्यक्रमात जया बच्चन यांचा अपमान केला होता. 

जया आणि अमिताभ यांनी ३ जून १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासून या जोडीचा सुखाने संसार सुरु आहे. परंतु, अमिताभ यांना अँग्री यंग मॅन म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा असंच रागाच्या भरात त्यांनी जया बच्चन यांना मीडियासमोर खडसावलं होतं. ज्यामुळे जया बच्चनही थक्क झाल्या होत्या.

'माझा काहीही संबंध नाही'; 'बच्चन कुटुंबाची सून' टॅगवर ऐश्वर्याची तिरकस प्रतिक्रिया

एकदा एका कार्यक्रमादरम्यान, अमिताभ यांना मीडियाच्या काही तिखट प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. मीडियाने त्यांना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारले होते ज्यामुळे बिग बी आधीच संतापले होते. या सगळ्याचा राग त्यांनी जया बच्चनवर काढला.

अमिताभ बच्चन यांनी घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; जया बच्चनमुळे वाचलं बिग बींचं करिअर

इंटरव्ह्यू संपल्यानंतर जया आणि अमिताभ लंचसाठी गेले. येथे 'तुम्हाला भात वाढू का?' असा प्रश्न जया यांनी विचारला. त्यांचा हा प्रश्न ऐकताच बिग बींच्या रागाचा पारा चढला आणि ते जयावर बरसले. "तुला हे माहितीये की मी भात खात नाही. तरी पण तू मला का विचारतेस?"  असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला. चारचौघांमध्ये बिग बी अशा प्रकारे संतापल्यामुळे जया बच्चन चांगल्याच खजील झाल्या होत्या. हा किस्सा पत्रकार करण थापर 'डेविल्स एडवोकेट: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात केला आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी