Join us  

'मी आधी गेले तर तू विषारी गवत खा' ट्विंकल खन्नाने पती अक्षय कुमारला दिला विचित्र सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:49 PM

लेखिका म्हणून नावारुपाला आलेली ट्विंकल खन्ना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

एकेकाळी अभिनेत्री असलेली आणि आता लेखिका म्हणून नावारुपाला आलेली ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) नेहमी चर्चेत असते. ट्विंकल खन्नाने सुरुवातीला काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर 2001 साली अक्षय कुमारशी (Akshay Kumar) लग्न केलं. २३ वर्षांपासून दोघांचा सुखी संसार सुरु आहे. नुकतंच ट्विंकलने असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी गेल्यानंतर तू विष पी असं ती अक्षयला म्हणाली. नक्की झालं काय वाचा.

ट्विंकल खन्ना अतिशय हजरजबाबी आहे. तसंच टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती कॉलम लिहिते. नुकत्याच आलेल्या कॉलममध्ये तिने वैयक्तिक आयुष्याविषयी एक खुलासा केला. अक्षय कुमारच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तिने सल्ला दिला. यावेळी तिने त्यांच्या एका व्हॅकेशनचा किस्सा सांगताना लिहिले, "मी एका कँपमधून परत येत असताना गाईड पक्ष्यांच्या जोडीकडे हात दाखवत म्हणाला, हे दोन्ही पक्षी एकमेकांसाठी इतके समर्पित आहेत की जर एकाचा मृत्यू झाला तर दुसरा विषारी गवत खाऊन मरुन जाईल."

बास मग काय  ट्विंकलने हाच सल्ला अक्षय कुमारला दिला. ती त्याला म्हणाली, 'जर माझा आधी मृत्यू झाला तर तूही विषारी गवत खा. जर मी तुझ्या दुसऱ्या पत्नीला माझ्या हँडबॅगसोबत पाहिलं तर खरं सांगते मी परत येऊन तुम्हाला दोघांना त्रास देईन.' हे ऐकून अक्षय म्हणतो,'मला तर आत्ताच ते विषारी गवत खायचं आहे, कमीत कमी तेव्हा तरी मला असली फालतू बडबड ऐकावी लागणार नाही.'

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारबॉलिवूडलग्न