Join us  

जग्गा जासूसच्या अभिनेत्रीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 8:55 AM

नुकताच प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19- नुकताच प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. बिदिशा बेजबरूआ असं या अभिनेत्रीचं नाव असून सोमवारी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती. सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत लोक भागात तिचा मृतदेह सापडला. या संपूर्ण घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. बिदिशा बेजबरूया स्मॉल स्क्रीनवरचा प्रसिद्ध चेहरा होता. तिने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. बिदिशा काही दिवसांपूर्वीचं मुंबईतून गुरूग्राममध्ये गेली होती. बिदिशाच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.  दरम्यान या प्रकरणी बिदिशाच्या पतीला या घटनेसाठी अटक करण्यात आली आहे. बिदिशा ही मूळची आसामची आहे.
आणखी वाचा
 

संजय दत्तची चांगल्या वर्तनामुळे लवकर सुटका

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण

"बिदिशा गुरूग्राममध्ये भाड्याचा घरात राहत होती. त्याच घरात तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. काही दिवसांपूर्वीच तिेने गुरुग्राममधील घर भाड्याने घेतलं होतं. बिदिशाचे वडील सोमवारी संध्याकाळपासून तिला फोन करत होते. पण ती फोनला उत्तर देत नव्हती. त्यावेळी काहीतरी घडलं असल्याचा तिच्या वडिलांना संशय आला. बिदिशा फोन उचलत नसल्याची माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. तसंच बिदिशा राहत असलेल्या घरचा पत्ताही दिला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा घरचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर पोलीस दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना बिदिशाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. पोलीस उपायुक्त दीपक सहारन यांनी ही माहिती दिली आहे. 

 
बिदिशाने प्रेमविवाह केला होता. पण तिचे नवऱ्यासोबत नेहमी खटके उडत होते, असा दावा बिदिशाच्या वडिलांनी तक्रारीत केल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे. बिदिशाचा मोबाइल फोन, फेसबुक आणि सोशल मीडियावरील सगळ्या अकाऊंटवरच्या संभाषणांची सध्या तपासणी सुरू झाली आहे. बिदिशाने आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त सहारन यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे बिदिशाच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. 
 
गेल्या वर्षी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने केली होती आत्महत्या
बालिका वधू मालिकेत आनंदीची भुमिका करणा-या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. गोरेगावमधील तिच्या राहत्या पोलिसांना मृतदेह आढळला होता. तिने गळफास लावून आत्महत्या केली होती.  प्रत्युषा बॅनर्जीने वैयक्तिक आयुष्यातील समस्येमुळे आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रियकरासोबत सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे. बालिका वधू मालिकेनंतर प्रत्युषा नावारुपाला आली होती त्यानंतर बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती.