Join us

कलाकारांसाठी कसा खास असणार हा गणेश उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2016 12:14 PM

Exculsive - बेनझीर जमादार             गणेश उत्सव म्हटले की, सर्व भक्तांमध्ये एक प्रकारचा ...

Exculsive - बेनझीर जमादार
            
 
गणेश उत्सव म्हटले की, सर्व भक्तांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो. प्रत्येकजण या गणेश आगमनाच्या तयारीला मोठया उत्साहात लागलेले असतात. घराघरांपासून ते शहराच्या प्रत्येक ठिकाणी गणेश भक्त हे गणेशाचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. तर यामध्ये प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. यंदा ही मराठी कलाकार मोठया दिमाखात गणेश उत्सव साजरा करणार आहे. हा गणेश उत्सव त्यांच्यासाठी कसा खास असणार आहे याविषयी कलाकारांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद.
 
स्वप्नील जोशी: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला देखील खारीचा वाटा असावा. या उद्देशाने आम्ही पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करतो. तसेच डेकोरेशन अगदी साधे असते. पण मायराला लाइटिंग पाहायला खूप गंमत वाटते. त्यामुळे यंदा लाईटिंग खूप छान करणार आहे. त्याचप्रमाणे मायराचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने आम्ही खूप आनंदित आहे. मायरा या उत्सवात पहिल्यांदाच बरेच मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वाना भेटणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव हा आमच्यासाठी खूप खास असणार आहे. 
 
भूषण प्रधान: घरामध्ये गणपती बसविण्याचे माझे लहानपणांपासूनचे स्वप्न यंदा पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या गणेश उत्सवाची परंपरा माज्या नवीन घरातूनच चालू करतो याचा मला अधिक आनंद होत आहे. या गणेश उत्सवात माझ्या आईने स्वत: बनवलेली शाडूची गणपतीची मूर्तीची आम्ही स्थापना करणार आहोत. यामुळे हा आनंद व्दिगुणीत झाला आहे. 
 
समृद्धी पोरे: यंदा आमच्या घराण्याचं गणेश उत्सावाच हे ५५ वर्ष आहे. काही वर्षीपासून आम्ही इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतो. तसेच आमच्या घरी गौरी ही बसवितात. त्यामुळे खूप मजा येते. तसेच आजच्या धावपळीच्या युगात या अशा उत्सवामुळे सर्व नातेवाइक, मंडळी एकत्रित येतात हे जास्त महत्वाचं असतं. 
 
सुनिल पाल: आमच्यासाठी हा उत्सव खूप खास असतो. कारण या उत्सावात माझा लहान मुलगा स्वत: वर्कशॉपमध्ये जाऊन गणपतीची मूर्ती बनवितो. त्यामुळे त्याचे खूप कौतुक वाटते. जगाच्या कोणत्याही कोपºयात असो, पण गणपतीच्या स्वागतासाठी मी मुंबईला पोहोचतोच. हा उत्सव आमच्यासाठी खूप आनंद घेऊन येतो. 
 
मृण्मयी देशपांडे: गौरी-गणपती हा उत्सव आम्ही मोठया उत्साहात साजरा करतो. सगळे बहिण-भाऊ एकत्रित येऊन गणेश आगमनाचे स्वागत करतो. पण मला नेहमी असे वाटते की, चौका-चौकात गणपती न बसविता एक गाव एक गणपती हीच लोकमान्य टिळकांची संकल्पना लोकांनी चालू करावी. 
 
मंदार चांदवलकर : गणेश उत्सव हा संपूर्ण शहरात जल्लोष करणारा सण असतो. या गणेश उत्सावाच्या दहा दिवसात खरचं खूप आनंददायी वातावरण असते. या गणेश उत्सावात आम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवू नये यासाठी शाडूच्या गणपतीची स्थापना करतो. आणि त्याचे विसर्जन देखील घराच्या बाहेर एका भांडयामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये करतो. त्यानंतर त्याची माती ही झाडांना टाकतो.