Join us  

'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालू खऱ्या आयुष्यात पण आहे प्रेमात, अभिनेत्रीने दिली ही हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:05 PM

Rajeshwari Kharat : अलिकडेच राजेश्वरी खरातने एका तरूणासोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता तिने जब्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत या चर्चांना पुर्णविराम लावला आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या २०१३ साली रिलीज झालेल्या 'फँड्री' (Fandry) चित्रपटाची चर्चा आजही होताना दिसते. या चित्रपटातील कलाकार हे एका रात्रीत स्टार झाले. फँड्री चित्रपटातून सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) 'जब्या'च्या तर राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) 'शालू'च्या भूमिकेतून ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली. सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांना भुरळ घातली होती. खऱ्या आयुष्यातही ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र आता राजेश्वरीने शेअर केलेल्या पोस्टमधून या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

अलिकडेच राजेश्वरी खरातने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तिच्यासोबत एका तरूणाचा फोटो पाहून ती जब्याला डेट करत नसल्याची चर्चा रंगली होती. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. फोटो शेअर करताना तिने लाल रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केला होता. यावरून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता तिने जब्यासोबतचा फोटो शेअर करत या चर्चांना पुर्णविराम लावला आहे.

राजेश्वरी खरात हिने जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडेसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघं रस्त्यावरून जाताना दिसत आहे आणि सोमनाथ तिच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यानंतर राजेश्वरी थांबून त्याच्याकडे पाहताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आणि कायमचं प्रेम. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाएका युजरने लिहिले की, असा पिक्चर पुन्हा कधीच होणार नाही... खरंच त्याकाळी हा फॅन्ड्री चित्रपट पाहून जाणीव झाली आणि बदल ही झाला. दुसऱ्या युजरने लिहिले की, खरंच खूप छान चित्रपट होता २०१३-१४ खूप गाजवला फँड्रीने मुळात प्रेम आणि सामाजिक वास्तविकता रेखाटली या कथेने आजही अप्रतिमच..आणखी एकाने लिहिले की, साऱ्या गावात चर्चा कुठली, आमच्या जब्याला शालू पटली. दुसऱ्या युजरने लिहिले की, राजश्री जब्या गरीब माणूस आहे पण मनाने दिलदार आहे लग्न कर ना त्याच्यासोबत आणि दोघजन परत आभिनय क्षेत्र गाजवा ही मराठी जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही.  

टॅग्स :राजेश्वरी खरात