Join us  

Nick of time: प्रियांका चोप्राने सोडला सलमान खानचा ‘भारत’! हे आहे कारण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:53 AM

बी- टाऊनमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. 

बी- टाऊनमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाद्वारे प्रियांका तब्बल दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार होती. पण ऐनवेळी तिने यातून अंग काढून घेतले.

‘भारत’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता प्रियांका चोप्रा ‘भारत’मध्ये नसेल. या मागचे कारण खूप विशेष आहे. प्रियांकाने आम्हाला अगदी ऐनवेळी तिचा निर्णय सांगितला. पण आम्ही तिच्यासाठी आनंदी आहोत. ‘टीम भारत’कडून प्रियांकाला खूप सारे प्रेम..., असे अली अब्बासने लिहिले आहे. प्रियांकाने ‘भारत’ सोडण्यामागे एक स्पेशल कारण आहे, असे अली अब्बासने म्हटले आहे. अलीच्या ट्विटमधील Nick of time हा शब्द प्रियांकाच्या लग्नाकडे इशारा करणारा आहे. होय, प्रियांका व तिचा बॉयफ्रेन्ड निक जोनास लवकरच लग्न करू शकतात आणि याच कारणाने प्रियांकाने ‘भारत’सोडला, असे मानले जात आहे. 

निक अलीकडे भारत भेटीवर आला होता. प्रियांकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याने खास ही ट्रिप प्लान केली होती. यादरम्यान प्रियांका व निक भारतात अनेक ठिकाणी जोडीने गेलेले पाहायला मिळाले होते. गोव्यातही त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला होता. यानंतर लवकरच प्रियांका व निक साखरपुडा करणार, अशी खबर आली होती. कदाचित याचमुळे प्रियांकाने ‘भारत’ सोडला असावा, असे मानले जात आहे. तशी दुसरीही एक चर्चा आहे.प्रियांकाने ‘भारत’पेक्षा खूप मोठा प्रोजेक्ट साईन केला, अशीही चर्चा आहे. आता खरे कारण काय, हे लवकरच कळेल. शेवटी प्रियांकाने ‘भारत’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला असावा, असे समजायला हवे.सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग सुरु झाले आहे. सलमानशिवाय या चित्रपटात दिशा पाटनी आणि तब्बू महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. प्रियांकाच्या जागी या चित्रपटात कुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा