गावच्या मातीशी जोडलेला अवघ्या २ तासांचा हा मराठी सिनेमा! हसून हसून दुखेल पोट; तुम्ही पाहिलाय का?
By देवेंद्र जाधव | Updated: February 7, 2025 18:07 IST
1 / 7२००८ साली हा मराठी सिनेमा आला. नवीन विषय आणि गावच्या मातीशी जोडलेली नाळ त्यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजला.2 / 7या सिनेमाचं नाव आहे 'वळू'. उमेश कुलकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा सिनेमा सिनेप्रेमींचा आवडता सिनेमा आहे3 / 7अतुल कुलकर्णीची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. अतुलच्या भावाला वळूबद्दल माहिती मिळवून त्यावर डॉक्यूमेंट्री बनवायची असते. त्यामुळे अतुल गावात येतो. मग पुढे सिनेमात येणारी धमाल तुम्हाला पाहायला मिळते.4 / 7अतुल कुलकर्णी, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, वीणा जामकर हे दिग्गज कलाकार सिनेमात दिसले. 5 / 7पुणे आंंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये हा सिनेमा चांगलाच गाजला. २००८ चे बहुतेक सर्व मानाचे पुरस्कार 'वळू' सिनेमाला मिळाले6 / 7या सिनेमाची कथा आणि पटकथा अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांनी मिळून लिहिली होती.7 / 7'वळू' सिनेमा हा मराठी सिनेसृष्टीला एक कलाटणी देणारा सिनेमा ठरला. 'वळू' सिनेमानंतर ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आणि मातीशी जोडणारे अनेक सिनेमे मराठीमध्ये आले