Join us  

बॉलीवूडमध्ये अफवांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 1:55 AM

तब्बल १७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर अरबाज खान आणि मलाईका अरोरा हे कपल विभक्त होत आहेत अशी अफवा पसरली होती. मलाईका आणि अर्जुन कपूरची जवळीकच घटस्फोटाचे प्रमुख कारण

तब्बल १७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर अरबाज खान आणि मलाईका अरोरा हे बॉलिवूडमधील फेव्हरेट कपल विभक्त होत आहेत अशी अफवा पसरली होती. मलाईका आणि अर्जुन कपूरची जवळीकच अरबाज-मलाईकाच्या घटस्फोटाचे प्रमुख कारण मानले जात होते. परंतु सोमवारी स्वत: मलाईकाने या वृत्ताचे खंडण केले. आम्ही सोबत असून आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आमच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या ही केवळ ‘अफवा’ आहे, असे तिने सांगितले. अशाप्रकारच्या अफवांचा फटका केवळ अरबाज- मलाईकालाच बसला असे अजिबात नाही. यापूर्वी देखील या अफवांना अनेक दिग्गज कलाकार बळी पडले आहेत. काळ पुढे सरकला आणि ज्या संबंधांबाबत लोकं चर्चा करत होते ती केवळ अफवाच होती, हे स्पष्ट झाले. अशाच काही गाजलेल्या अफवांवर एक नजर...सलमान-असिन‘रेडी’च्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि असिन यांनी लग्न केल्याची जोरदार अफवा पसरविण्यात आली होती. याबाबत असिनला तिच्या आप्तस्वकीय व फॅन्सकडून मेसेज देखील पाठविण्यात आले. सलमानने तर या अफवेला इन्जॉय करीत ‘केले एकदाचे लग्न’ असे ट्विट केले होते. मात्र नंतर ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले. सलमानने या अफवेला महत्त्व दिले नसले तरी असिनला मात्र त्याचा त्रास झाला. शाहरूख खान-प्रियांका चोप्राशाहरुख- प्रियंकामध्ये गुप्तगू असल्याची अफवा सर्वाधिक चर्चिली गेली. ही अफवा का व कशासाठी पसरविण्यात आली काही माहिती नाही. परंतु यासाठी माध्यमांना दोषी ठरवण्यात आले. दोघांमधील नाते चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडल्याचा ठपका मीडियावर ठेवला गेला. या कथित संबंधावरून शाहरुख व गौरी यांच्यात काही काळ दुरावा निर्माण झाल्याचेही वृत्त होते. जॉन-बिपाशा जॉन अब्राहम आणि बिपाशा बसु यांच्यात अचानक ब्रेक अप झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. ऐवढेच नाही तर जॉनने लग्न केल्याचेही अचानकच समजले. या दरम्यान काय घडले हे मात्र कोणालाच कळाले नाही. पुढे बिपाशाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. परंतु हे नाते अस्तित्वातच नव्हते. तरीही यामुळेच जॉन बिपाशापासून वेगळा झाल्याचे आजही बोलले जाते.हृतिक रोशन-सुजान हृतिक रोशन आणि सुजान यांच्या अचानक झालेल्या घटस्फोटामुळे संगळ्यानाच धक्का बसला. यांच्या घटस्फोटाचे प्रमुख कारण अर्जुन रामपाल असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. सुरुवातीला स्वत: ऋतिकने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र ही अफवा कधीच संपली नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र या लव्ह ट्राअ‍ॅँगलचा खरा अ‍ॅँगल अजूनही पुढे आला नाही.