Join us  

मालिका रंजक वळणावर!

By admin | Published: June 03, 2017 5:55 AM

मालिकेमध्ये बऱ्याच वेळानंतर सरस्वतीचे मोठे मालक म्हणेच राघव परतणार आहेत. राघव आणि सरस्वती काही दिवसांपूर्वीच दुबईची

मालिकेमध्ये बऱ्याच वेळानंतर सरस्वतीचे मोठे मालक म्हणेच राघव परतणार आहेत. राघव आणि सरस्वती काही दिवसांपूर्वीच दुबईची वारी करून आले. दोघांनीही दुबईमध्ये खूप छान क्षण देखील घालवले. परंतु दोघांच्याही नशिबात काही वेगळेच लिहिले होते. याच वारीदरम्यान सरस्वतीने तिच्या मोठ्या मालकांना गमावले आणि हे कटू सत्य पचवणे सरस्वतीसाठी खूपच कठीण होते. पण, तिला कुठेतरी विश्वास आहे की तिचे मोठे मालक परतणार, आणि तसेच काहीसे घडणार आहे. अचानक राघवच्या झालेल्या मृत्यूमुळे सरस्वती पूर्णत: खचून गेली आणि त्यामध्ये तिच्यावर कान्हाची जबाबदारी देखील असल्यामुळे तिला आता खंबीर आधाराची गरज होती. पण, या सगळ्या परिस्थितीमध्ये तिने स्वत:वरच्या विश्वासाला कधीच तुटू दिले नाही वा आपल्यावर असलेल्या घराच्या जबाबदारीवर दुर्लक्ष केले नाही. विद्युल आणि भिकू मामांच्या सगळ्या कारस्थानांना देखील तिने खंबीरपणे उत्तर दिले. या सगळ्या अडचणीमध्ये मालिकेत राघवच्या सावत्र भावाची म्हणजेच रणजीत अचानक आल्यामुळे मालिकेला नवे वळण मिळाले. भांडण आणि नात्यातल्या कडूपणाचे हळूहळू मैत्रीत रूपांतर झाले आणि रणजीत मात्र राघवची वाट बघणाऱ्या सरस्वतीच्या प्रेमात पडला. परंतु सरस्वती अजूनही राघवचीच वाट बघत आहे. आता राघवच्या येण्याने पुढे काय होणार, हा प्रश्न आहे.