Join us  

सेटवरच जुळल्या रेशीमगाठी!

By admin | Published: June 17, 2017 2:33 AM

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. म्हणूनच आयुष्यभराचा सोबती कधी व कुठल्या वळणावर भेटेल याचा काही नेम नसतो.

- Satish Dongare

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. म्हणूनच आयुष्यभराचा सोबती कधी व कुठल्या वळणावर भेटेल याचा काही नेम नसतो. बॉलिवूडमध्ये तर याचा बऱ्याचदा प्रत्यय आलेला आहे. कारण बरेचशी अशी जोडपी आहेत, ज्यांना आपला जीवनसाथी शूटिंगच्या सेटवरच मिळाला आहे. आज हे जोडपे गुण्या-गोविंदाने नांदत आहेत; मात्र यांच्या लग्नाची सर्वात मजेशीर बाब म्हणजे कोणी अटी-शर्ती ठेवून लग्न केले, तर कोणी हॉटनेसवर फिदा होऊन लग्नाच्या बंधनात अडकणे पसंत केले. अशाच जोडप्यांच्या लव्हस्टोरीचा हा खास रिपोर्ट...रितेश देशमुख-जेनेलिया डिसूझारितेश आणि जेनेलियाची भेट २००२ मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या वेळी जेनेलियाला कळून चुकले होते की, रितेश जमिनीशी नाते असलेली व्यक्ती आहे. एका मुख्यमंत्र्यांचा मुलगा असतानाही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गर्विष्ठपणा नाही. तो प्रत्येक व्यक्तीबरोबर अतिशय शांतपणे बोलतो. रितेशच्या याच खुबी बघून ती त्याच्या प्रेमात पडली. तब्बल दहा वर्षं एकमेकांशी डेटिंग केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी विवाह केला. आज त्यांना दोन मुले आहेत. सोहा अली खान- कुणाल खेमूसैफअली खान याची लहान बहीण सोहा अली खान अभिनेता कुणाल खेमू याच्याबरोबर लक्झ्ुारियस लाइफ जगत आहे. या दोघांची भेट २००९मध्ये आलेल्या ‘ढूॅँढते रह जाओगे’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर झाली होती; मात्र या वेळी दोघांनी असा विचार केला नव्हता की, हे दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहतील. परंतु जेव्हा हे दोघे ‘९९’ च्या सेटवर दुसऱ्यांदा भेटले, तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे शर्मिला टागोर यांनी कुणालचीभेट घेतली. त्यांनाही कुणाल आवडला. पुढे दोघांनी लग्न केले. अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायअभिषेक आणि ऐश्वर्या ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सेटवरच अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. वास्तविक या चित्रपटात एकत्र येण्याअगोदरपासूनच त्यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरारे...कजरारे’ या गाण्याच्या शूटिंगनंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर ‘उमराव जान’ आणि ‘धूम-२’ मध्येही ही जोडी झळकल्याने चर्चेला उधाण आले. अखेर ‘गुरू’ च्या सेटवरून त्यांच्या रिअल लाइफ प्रवासाला सुरुवात झाली. अक्षयकुमार- ट्विंकल खन्नाबॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि ट्ंिवकल खन्ना यांची पहिली भेट ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर झाली अन् त्याच ठिकाणी अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला. काही दिवस डेटिंग केल्यानंतर अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली. यादरम्यान ट्ंिवकलचा ‘मेला’ हा चित्रपट रिलीज होणार होता. यावेळी ट्विंकलने अक्षयला म्हटले की,‘मला विश्वास आहे की, माझा हा चित्रपट सुपरहिट होईल. परंतु जर हा चित्रपट हिट नाही झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. अक्षयच्या सुदैवाने हा चित्रपट फ्लॉप ठरला. पुढे ट्विंकलने अक्षयशी लग्न केले.’सैफ अली खान-करिना कपूरबॉलिवूडमधील सर्वाधिक हॉट कपल म्हणून सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्याकडे बघितले जाते. ‘टशन’ या चित्रपटासाठी करिना लडाख आणि राजस्थान येथे शूटिंग करीत होती. याचदरम्यान करिनाचे शाहिदबरोबर ब्रेकअप झाले होते. करिनाने एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘लडाखमध्ये शूटिंगदरम्यान सैफला बघितले होते. त्यावेळी त्याच्याशी फारसे बोलणे झाले नाही. सैफ एका हॉटेल पूलमधील लॉउंज चेअरवर बसला होता. त्यावेळी मी त्याला मागे वळून बघितले अन् मैत्रिणींना म्हटले, ‘ओह माय गॉड, सी सो सो हॉट’ पुढे आमच्यातील लव्हस्टोरी बहरत गेली.