Join us  

दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 2:42 PM

अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता जयम रवीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. जयम रवीने पत्नी आरतीसोबतचे 15 वर्षांचे नाते संपवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आम्ही १५ वर्ष सोबत राहिल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे जयम रवीने म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपाराून हे दोघांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा होती. आता अखेर जयम रवीने पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं,  "खूप विचार आणि चर्चेनंतर मी आरतीसोबतचं माझ नात संपवण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय घाईघाईने घेतलेला नाही, तर वैयक्तिक कारणांमुळे घेतला आहे. मला वाटतं हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे".

पुढे त्याने लिहलं, "मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करा. कोणतेही अनुमान लावणे, अफवा किंवा आरोप करणे टाळा. हे प्रकरण वैयक्तिक ठेवा. चाहत्यांचं आणि प्रेक्षकांचं माझ्या चित्रपटांद्वारे  मनोरंजन करणे हेच माझं प्राधान्य राहिले आहे.  तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही माझ्यावर वर्षानुवर्षे केलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. मला समजून घेण्यासाठी आणि सतत दाखवलेल्या समर्थनासाठी खूप खूप आभार".

जयम रवीने 2009 मध्ये आरतीशी लग्न केलं होतं. जयम रवी आणि आरती यांना आरव आणि अयान नावाची दोन मुले देखील आहेत. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा कुणाकडे राहिल, याबाबत त्याने काही शेअर केलेलं नाही. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता अभिनेता फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे.  जयम रवीने मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन'च्या दोन्ही भागात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचा तो सहकलाकार आहे.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीऐश्वर्या राय बच्चनघटस्फोट