Join us  

दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:09 AM

नागा चैतन्यला शोभिताशी अगदी साध्या पद्धतीने करायचंय लग्न, सांगितलं मोठं कारण

साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर आता नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्यने बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. साखरपुडा केल्यानंतर आता नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पण, नागा चैतन्यला मात्र अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा करत त्याने कारण सांगितलं आहे. 

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मार्च २०२५मध्ये ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या लग्नासाठी वेडिंग मेन्यूही शोधला जात असून हे एक डेस्टिनेशन वेडिंग असल्याचं सांगितलं जात होतं. पण, नागा चैतन्यला मात्र या लग्नात कोणताही तामझाम नकोय, असं खुद्द अभिनेत्यानेच सांगितलं आहे. एका इव्हेंटमध्ये त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. "लग्न हे त्या लोकांसाठी आहे जे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. संस्कृती आणि परंपरांना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला याप्रकारचे अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. कोणत्याही धामधुमीत मला लग्न करायचं नाही", असं नागा चैतन्य म्हणाला. 

नागा चैतन्य आणि शोभिताने ८ ऑगस्टला गुपचूप साखरपुडा केला होता. नागार्जुन यांनी फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. नागा चैतन्य आणि शोभिताच्या रिलेशनशिपच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. त्या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पण, दोघांनीही याबाबत भाष्य करणं टाळलं होतं. अखेर साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिताने त्याचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं. 

नागा चैतन्यने याआधी अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर २०१७मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. पण, अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसेलिब्रेटी वेडिंग