Join us  

"तू घर तोडते रह गयी और मैं दिल जीत के ले गयी", आर्याचं रोखठोक रॅप ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:44 PM

आर्याने रॅपमधून रोखठोक मत मांडलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला (Aarya Jadhao) घराबाहेर काढण्यात आलं. आर्याने कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीच्या थेट कानशि‍लात लगावली होती. आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही. 'बिग बॉस मराठी'चे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत. सर्वजण आर्याला पाठिंबा देत आहेत. अशातच आता घराबाहेर आल्यानंतर आर्याने एक रॅप केलं आहे.

आर्या जाधवने बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली, त्यांच्य़ाशी संवाद साधला. यावेळी आर्याने रॅपमधून रोखठोक मत मांडलं. 

कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया सरे आम

बात बाप तक चली गयी, हम सहेते रहें हाय राम

धक्के की चादर तलें छुपाई तुने वो हिंसा थी

जब देती रही तू घाँव मुझे, तब कहा गयी तेरी चिंता थी

फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जबाब दिया

मेरे कर्माने मुझसे… मेरे दो पल की गलती का हिसाब लिया

पर तेरा भी तो कर्मा हैं… ये तुझको भी तो मिलना हैं

और देख रही इन जनता इसको हलके मैं तू ले गयी

तू घर तोडते रहे गयी…और मैं दिल जीत के ले गयी!

आर्याचे हे रॅप चाहत्यांना आवडलं आहे. आर्या ही घराबाहेर आली असली तरी तिची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण,  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या  रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही. घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलेलं नाही. बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पाटी अद्यापही आहे, त्यामुळे चाहत्यांना ती पुन्हा घरात जाणार, अशी आशा वाटतेय. पण, याबाबत आर्या किंवा बिग बॉसकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी