जवळपास 2 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर 'विठुमाऊली' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची सांगताही भक्तीपूर्ण वातावरणात होणार आहे. भक्त परंपरेची मुहूर्तमेढ रोवत आणि युगानुयुगे भक्तांचा माऊली प्रमाणे सांभाळ करण्याचं वचन देत विठुमाऊली शरीररूपाने अंतर्धान पावली. मात्र युगानयुगे विटेवरी उभी राहून ती भक्तांचा सांभाळ करते आहे. संत पुंडलिक, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा यांनी संत परंपरा अखंड चालू ठेवली आणि आजतागायत कोणताही खंड न ही परंपरा सुरू आहे. विठुमाऊली मालिकेचा अखेरचा भागही हाच संत परंपरेच्या संदेश देत पूर्णत्वास जाणार आहे. २२ मार्चला रात्री ८ वाजता महाएपिसोडने या मालिकेची सांगता होईल.
अग्निहोत्रनंतर आणखीन एक मालिका घेणार निरोप, असा होणार शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:44 IST