Join us  

Bigg Boss Ott 3 मधून बाहेर आल्यावर पुन्हा वडापाव विकणार? चंद्रिका म्हणाली - "माझं अस्तित्व हे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 1:50 PM

Bigg Boss OTT 3 मधून बाहेर आल्यावर 'वडापाव गर्ल' पुन्हा वडापाव विकणार का? यावर तिने उत्तर दिलंय (chandrika dixit, bigg boss ott 3)

Bigg Boss OTT 3 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. घरातले सर्वच स्पर्धक जबरदस्त कंटेंट देत वाहवा मिळवत आहेत. घरात सर्वात जास्त चर्चा झाली ती 'वडापाव गर्ल' अशी ओळख असणाऱ्या चंद्रिका दीक्षितची. चंद्रिकाला काहीच दिवसांपूर्वी Bigg Boss OTT 3 मधून बाहेरचा रस्ता धरावा लागला. त्यानंतर चंद्रिकाने दिलेल्या मुलाखतीत  Bigg Boss OTT 3 मधून बाहेर पडल्यावर ती पुन्हा वडापाव विकणार का, याचा खुलासा केलाय.

Bigg Boss OTT 3 मधून बाहेर पडल्यावर चंद्रिका पुन्हा स्टॉलवर?

नवभारत टाईम्सने केलेल्या रिपोर्टनुसार चंद्रिकाला मुलाखतीत ती पुन्हा दिल्लीच्या स्टॉलवर वडापाव विकणार का? असं तिला विचारण्यात आलं. यावर चंद्रिकाने उत्तर दिलं की, "वडापाव विकणं ही माझी ओळख आहे. वडापाव विकणं माझं अस्तित्व आहे. जेव्हा मला नोकरीतून काढण्यात आलं तेव्हा वडापाव विकून मी स्वतःची ओळख बनवली. त्यामुळे हे काम मी सोडणार नाही. चालू ठेवेल."

माझी इमेज बदललीय: चंद्रिका दीक्षित

चंद्रिका मुलाखतीत पुढे म्हणाली, "बिग बॉसमध्ये गेल्याने माझी इमेज बदलण्यात मी यशस्वी झालेय. लोकांना वाटत होतं की मी सतत भांडणं करते. पण आता लोकांना कळलं असेल की मी खूप प्रेमही करते अन् काळजीही घेते. शोमध्ये पॉलोमीने मला सांगितलं होतं आपण खरे कोण आहोत हे जगाला कळलं पाहिजे. साई केतन राव आणि रणवीर शौरी यांचंही माझ्याबद्दलचं मत बदललं. त्यामुळे मी स्वतःला आधीपासून एक विजेती मानते." २४ दिवस घरात राहिल्यानंतर वडापाव गर्लचा 'बिग बॉस ओटीटी ३' मधला प्रवास संपून ती एलिमिनेट झाली. 

टॅग्स :बिग बॉसदिल्ली