Join us  

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत आनंदीची पुन्हा एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 4:44 PM

Man Dhaga Dhaga Jodate Nava : सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता मालिकेत पुन्हा एकदा आनंदी पाहायला मिळणार आहे. पण ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत लिप घेण्यात आल्याने कथानकात हा ट्विस्ट आणला गेला होता. त्यानंतर सुखदाचे पात्र सार्थकच्या आयुष्यात आले. ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख हिने साकारलेली पाहायला मिळाली. सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता मालिकेत पुन्हा एकदा आनंदी पाहायला मिळणार आहे. पण ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मन धागा धागा जोडते नवा मालिकेत दिव्या पुगावकर हिने आनंदीची भूमिका साकारली आहे. आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात अनेक वादळं आली पण या दोघांनी खंबीरपणे एकमेकांना साथ दिली. आता हे दोघे एकत्र येणार असे असतानाच आनंदी मालिकेतून अचानकपणे गायब झाली. यादरम्यान दिव्या पुगावकर हिला नवीन संधी मिळाल्याचे बोलले जाऊ लागले. तर काहींनी तिचे लग्न ठरल्याचीही अफवा पसरवली. पण आता दिव्या पुन्हा एकदा मालिकेतून एन्ट्री करताना दिसत आहे. पण हो यावेळी ती आनंदी म्हणून नाही तर कल्याणी बनून मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

डॅशिंग अंदाजात असलेली ही कल्याणी आनंदीच आहे पण तिने तिचं नाव का बदललं आणि ती एवढी वर्षे कुठे गायब होती हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे मालिकेचा हा ट्विस्ट रंजक घडामोडी घडवताना दिसणार आहे. आनंदीला मालिकेत परत पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे सुखदा आणि सार्थकच्या आयुष्यात आता आनंदीची एन्ट्री धमाल घडवून आणणार हे पाहणे कमालीचं ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह