Join us

हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:18 PM

टोलमाफीनंतर ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. याबाबत रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून मुंबईतील टोलनाक्यांवरील टोलमाफी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषण केली होती. मात्र, टोलमाफीनंतर ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. याबाबत रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. 

अपूर्वा नेमळेकर ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. अभिनयाबरोबरच अपूर्वा तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. सध्या अपूर्वा तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आहे. अपूर्वाला सकाळी ७ वाजता ट्राफिकचा सामना करावा लागल्याने अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ठाण्यातील वाहतुक कोंडीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते, "हवं तर टोल घ्या...पण, Lanes सुरू करा...सकाळी ७ वाजता अशक्य ट्राफिक जाम...!! एक त्रस्त ठाणेकर". अपूर्वाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आभास हा या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने अपूर्वाला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील तिची शेवंता ही भूमिका प्रचंड गाजली. 'बिग बॉस मराठी ४'मध्ये अपूर्वा सहभागी झाली होती. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटिव्ही कलाकारठाणे