Join us

"मी जेव्हा बोलतो तेव्हा मुंबई चालू होते"; भाईजानसमोरच सदावर्तेंची डायलॉगबाजी! सलमान म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 5:53 PM

बिग बॉस हिंदी सीझन १८ च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानसमोरच गुणरत्न सदावर्तेंनी डायलॉगबाजी सुरु केल्याची गोष्ट पाहायला मिळाली (salman khan, gunratna sadavarte)

सध्या Bigg Boss 18 ची चर्चा खूप आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी आहेत. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास स्वॅगमध्ये Bigg Boss 18 चं सूत्रसंचालन करतोय. आज Bigg Boss 18 मध्ये पहिला वीकेंड का वार रंगणार आहे. यात सलमान घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. गेले आठवडाभर घर गाजवणारे आणि विविध डायलॉग मारुन सर्वांनाच थक्क करणारे गुणरत्न सदावर्ते आज सलमान खानसमोर त्यांच्या खास संवादांची झलक दाखवणार आहेत. ते ऐकून सलमानलाही हसू आवरणार नाही असं दिसतंय.

गुणरत्न सदावर्तेंची सलमानसमोरच डायलॉगबाजी

Bigg Boss 18 चा आजचा प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोत सलमान खान आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात गमतीदार संभाषण होताना दिसतंय. सलमान सदावर्तेंना विचारतो, "सरकार खरंच तुम्हाला घाबरते का?" हे ऐकताच सदावर्ते म्हणतात, "मी जेव्हा बोलतो मुंबई चालू तेव्हा मुंबई चालू होते. सध्या माझी खूप चालते कारण मी डंके की चोटवर ठाम बोलतो." हे ऐकून सलमानला हसू आवरलं नाही. भाईजान शेवटी हसत हसत म्हणतो, "गुणरत्न खुश हुआ." हे ऐकताच गुणरत्न मोठ्याने हसतात. हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल झालाय. 

गुणरत्न सदावर्ते Bigg Boss 18 मधून बाहेर जाणार?

बिग बॉस १८ मध्ये पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य नुकतंच पार पडलं. या नॉमिनेशन कार्यात अभिनेता करण वीर मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं. त्यामुळे सदावर्ते आणि करणमध्ये वादही झाला. सदावर्ते यांच्याबरोबरच चाहत पांडे, करण वीर मेहरा, मुस्कान बामने, अविनाश मिश्रा हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात सदावर्ते घराबाहेर जाणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्तेसलमान खान