Join us  

'हिंसा चुकीची असली तरीही निक्कीसाठी...'; कानाखाली वाजवल्यावर आर्याने मनातली भावना स्पष्टपणे सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:16 AM

बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवने लोकमत फिल्मीला दिलेल्या exclusive मुलाखतीत तिचं मत व्यक्त केलंय (bigg boss marathi 5, aarya jadhav)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सध्या एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी आहेत. या स्पर्धकांची सध्या चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एक प्रकरण चांगलंच गाजलं ते म्हणजे आर्याने निक्कीला कानाखाली मारली. या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली. निक्कीवर हात उगारल्याने आर्याला या प्रकरणामुळे नाराजी कमी आणि लोकांचा सपोर्ट जास्त मिळाला. आर्याने या प्रकरणाशी लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली.

निक्कीला मारल्यावर आर्याचं स्पष्टीकरण

बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर आर्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी स्वतःसाठी जी रिअॅक्शन दिली ती नॅचरल होती. पण बाहेर आल्यावर लोकांचं प्रेम पाहून मला मी जे केलंय ते बरोबर वाटलं. सगळ्यांना सपोर्टसाठी धन्यवाद. जर मी दोन-तीन वेळा तिला मारलं असतं तर तिच्यात आणि माझ्यात काही फरक नाही राहणार. तिच्यासारखी धक्काबुक्की मी पण केली असती, तर नाही. मी तिला सणसणीत ठेऊन दिली. खूप जोरात. मला यावर हसू येतं. पण आता मात्र अपराधी वाटतंय. कोणावरही हात उगारणं हे चुकीचं आहे. त्या उद्रेकाच्या एका क्षणी ती प्रतिक्रिया मी दिलेली. हे मी नव्हतं करायला पाहिजे. एक महिन्याचा माझा संयम सुटला. हे चुकीचं आहे पण निक्की याला डिझर्व्ह करते. " 

आर्या आणि निक्कीमध्ये काय घडलं होतं?

'बिग बॉस मराठी'च्या घरात गुरुवारी कॅप्टन्ससीचा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान आर्या व  निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोणावर हात उगारायला बंदी आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले. अखेर शिक्षा म्हणून आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन