Join us  

Bigg Boss Marathi 5 : निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:31 PM

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. या दरम्यान निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'चे पाचवे सीझन (Bigg Boss Marathi Season 5) अलिकडेच भेटीला आला आहे. यंदा घरात एकापेक्षा एक दमदार सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे. अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठी सुरू होऊन पंचवीस दिवस झाले आहेत आणि घरात दररोज सदस्यांमध्ये नवनवीन नाद होताना दिसतात. दरम्यान निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. दरम्यान वैभव म्हणतो,"निक्कीसाठी मी कोणतेही फेव्हर घेणार नाही". यावर निक्की म्हणते,"मी माझ्या मतावर ठाम आहे". त्यावर वैभव निक्कीला म्हणतो,"तू थेट तुझे मत मांडू शकत नाही". दुसरीकडे घन:श्याम म्हणतोय,"निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो". वैभव निक्कीला म्हणतो,"तुला बोलण्याचा मला हक्क आहे". सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हेदेखील लवकरच समोर येईल.

आजच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला म्हणत आहे,"तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही". त्यावर अभिजीत म्हणतो,"हा तू मनापासून माफी मागते". निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी