Join us  

"निक्की माझ्यासाठी पहिलं प्राधान्य तर वैभव..." अरबाज पटेलने स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:03 PM

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे.

Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या सदस्यांपैकी एक म्हणजे अरबाज पटेल होता. अरबाज पटेल हा 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडताच वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो आहे. प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने 'बिग बॉस मराठी'मधून त्याला बाहेर जावं लागलं. दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरात अरबाज आणि निक्की या जोडीनं कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. तर अरबाज आणि वैभवची गट्टीही या कार्यक्रमात जमली. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले.

'बिग बॉस'च्या घराबाहेर पडताच अरबाजने 'लोकमत फिल्मी' ला त्याची प्रतिक्रिया दिली. त्यादरम्यान तो म्हणाला, "माझी 'Frist Priority' निक्की होती तर वैभव माझी 'Second Priority'  होता. तरीसुद्धा मी त्याच्या कॅप्टन्सीसाठी खूप प्रयत्न केला. हे सगळ्यांनी पाहिलं आहे. एका टास्क दरम्यान तर जान्हवी आणि वैभवने माझ्यासोबत भांडण केली तरी देखील मी त्याच्याकडे जात होतो. काय तरी प्लॅन करा! जिंकायचं आहे, तुमच्यापैकी कोणीतरी एक कॅप्टन झाला पाहिजे. असं असतानाही त्यांनी मला तू आमच्याकडे येऊ नको सांगितलं. एवढं सगळं घडलं आणि तरीही मी निक्कीसोबत भांडणं केली आणि म्हटलं मला वैभव आणि जान्हवी आपल्यासोबत पाहिजे. यासाठी निक्कीचा विरोध होता. तरीपण मी त्यांच्यासाठी उभा राहिलो".

पुढे अरबाज म्हणाला, "जेव्हा त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळाली ते मी केलं. शिवाय मी त्यांना असंही सांगितलं होतं की, तुमचं नाव मी नॉमिनेशनमध्ये टाकणार नाही आणि तसा मी वागलो. या सगळ्या घडामोडींमध्ये मला एक संधी मिळाली जेव्हा कॅप्टन्सी मी निक्कीला दिली कारण तिने माझ्याकडे बर्थडे गिफ्ट मागितलं होतं. तेव्हा मी कॅप्टन्सी निक्कीला दिली. तेव्हा मी माझं पहिलं प्राधान्य तिला दिलं. जेव्हा माझा कॅप्टन्सी टास्क चालू होता तेव्हा निक्कीने माझं नाव सूचवलं. याउलट जान्हवीने तिला कॅप्टन व्हायचं आहे म्हटलं. जान्हवीने तेव्हा तिचा विचार केला. पण निक्कीने असं न करता माझं नाव घेतलं, की अरबाज कॅप्टन झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही की मी निक्कीसाठी काय केलं? तिनेही माझ्यासाठी खूप काही केलंय". 

पहिल्याच आठवड्यापासून 'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचं वारं वाहू लागलं होतं. त्यानंतर अरबाज आणि निक्कीमधील नातं आणखी घट्ट होऊ लागलं होतं. दरम्यान, आठव्या आठवड्यात बिग बॉसमधून अरबाज एलिमिनेट झाला. अरबाजलाही हा निकाल धक्कादायक असल्याने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. तो निक्कीला मिठी मारून ढसाढसा रडला. अखेर आठ आठवड्यांनी अरबाजला बिग बॉसमधून बाहेर जावं लागलं.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया