Join us  

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का? आर्या म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:09 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: आर्या जाधवने केलं स्पष्ट, बिग बॉसमध्ये परत जाण्याविषयी म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एक मोठी घटना घडली. बिग बॉसचा मूलभूत नियम मोडल्याने अमरावतीच्या आर्या जाधवला (Aarya Jadhao) घराबाहेर जावं लागलं. आर्याने कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीच्या थेट कानशि‍लात लगावली. याचीच शिक्षा तिला मिळाली. आर्याने चूक केली असली तरी प्रेक्षक मात्र तिलाच साथ देताना दिसत आहेत. निक्कीचं वागणं पाहून सगळेच वैतागलेत. नुकतचं आर्याने पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का यावर उत्तर दिलं.

आर्या जाधवने बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं. यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. निक्कीसोबत झालेला घटनाक्रमही तिने सांगितला. तसंच बिग बॉस स्क्रीप्टेड नाही हेही तिने स्पष्ट केलं. दरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की, 'बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का?' यावर आर्या थोडा विचार करुन म्हणाली, "नक्कीच जाणार. पूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी लढत आहे. तुम्ही माझ्यासोबत आहे. तर तुमच्यासाठी नक्कीच जाणार. तुमचे डोळे बंद नाहीयेत हे बघून छान वाटलं."

आर्याला संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देतोय हे पाहून तिने सर्वांचे आभार मानले आहेत. तसंच हे प्रेम पाहूनच पुन्हा संधी मिळाली तर घरात जाईन असंही ती म्हणाली. आर्या अमरावतीची रॅपर आहे. तिने MTV HUSTLE 2.0 मध्ये सहभाग घेतला होता. तिचं 'नऊवारी रॅप साँग' खूप गाजलं. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनसोशल मीडिया