Join us  

Bigg Boss Marathi Season 5: 'स्वत:वर कंट्रोल ठेव', जान्हवीला नवऱ्याचा सल्ला; म्हणाला, "तळ्यात मळ्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 5:26 PM

सध्या घरात सदस्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत. ६० दिवसांनी आपल्या माणसांना भेटून सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. यावेळी १०० नव्हे तर ७० दिवसात शो संपतोय. सध्या घरात सदस्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत. ६० दिवसांनी आपल्या माणसांना भेटून सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत. जान्हवी किल्लेकरलाही (Janhavi Killekar) भेटायला तिचा पती किरण आणि मुलगा ईशान आले. यावेळी जान्हवीला नवऱ्याने काय सल्ला दिला बघा.

कलर्सने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी भेटायला आलेले तिचे पती किरण तिला म्हणतात, "स्वत:वर कंट्रोल ठेव. नॉमिनेशनला घाबरु नको. तू खूप व्यवस्थित खेळत आहे. नॉमिनेशनमध्ये आली म्हणजे तू वीक आहेस असं होत नाही. तुला अंदाज नाही ते मला समजलं. तुला शिक्षा झाली तू त्यातून बाहेर आलीस. आता तळ्यात मळ्यात करु नकोस. ठाम राहा."

यावर जान्हवी म्हणते, "बाकी सगळे याआधीही अनेकदा नॉमिनेशनमध्ये आले आहेत. मी एकदाच आलीये. त्यामुळे मला अंदाज आहे. आता माझा स्वत:वर कंट्रोलही आहे आणि मी ठामही आहे."

६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी सीझन ५ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. सध्या घरात वर्षा, अभिजीत, पॅडी, निक्की, जान्हवी, सूरज, धनंजय आणि अंकिता असे आठ स्पर्धक राहिले आहेत. हे सर्वच या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. यांच्यातील कोणता सदस्य बाहेर पडतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारकलर्स मराठीसोशल मीडिया