Join us  

"त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र", वर्षा उसगांवकर यांच्यासोबतच्या गैरवर्तणुकीवर संतापला कपिल होनराव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 9:58 AM

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यात सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद पाहायला मिळत आहेत. त्यात निक्की वारंवार वर्षा उसगांवकर यांचा अपमान करताना दिसते.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यात सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद पाहायला मिळत आहेत. त्यात निक्की वारंवार वर्षा उसगांवकर यांचा अपमान करताना दिसते. दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मल्हारची भूमिका साकारून घराघरात पोहचलेला अभिनेता कपिल होनराव याने ऑनस्क्रीन आई म्हणजेच वर्षा उसगांवकर यांच्यासोबत बिग बॉसच्या घरात झालेल्या गैरवर्तणुकीवर संतापला आहे आणि त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता कपिल होनराव आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत काम केले आहे. या मालिकेत त्यांनी आई आणि मुलाची भूमिका केली होती. दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये वर्षा उसगांवकर स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. या शोमध्ये त्यांनी निक्की तांबोळीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक पाहून चाहत्यांसोबत काही कलाकारही संतापले आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त करत आहेत. कपिलनेदेखील सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.

कपिल होनरावने वर्षा उसगांवकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की,  खंबीर राहा माई. त्यांनी तिला खूप त्रास दिला....ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र.. मला आशा आहे की रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील ह्या सगळयांची. कपिलच्या या पोस्टवर नेटकरीदेखील निक्कीविरोधात आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. रितेश भाऊंच्या धक्क्यावर अभिनेता यावर काय कारवाई करणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीवर्षा उसगांवकर