Join us  

'हे' तिघे माझे बेस्ट फ्रेंड! घराबाहेर आल्यावर वैभव चव्हाण नक्की काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 7:10 PM

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यावर वैभवने गेमबद्दल मत व्यक्त केलं. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व दणक्यात सुरू आहे.  सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि दुसरा वैभव चव्हाण हे दोन सदस्य घराबाहेर झाले.  'बिग बॉस'ने शिक्षा सुनावल्याने आर्याने तर नॉमिनेशमध्ये कमी मते पडल्याने वैभवने घराचा निरोप घेतला.  'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यावर वैभवने गेमबद्दल मत व्यक्त केलं. 

घराबाहेर पडल्यानंतर वैभवने Bigg चर्चा या सेगमेंटमध्ये बोलताना गेल्या सात आठवड्यांत त्याला आलेले अनुभव शेअर केले. वैभव म्हणाला, "घरात गेलो, तेव्हा थोडा गोंधळलो होतो. पण, नंतर खूप मजा आली. 'अरबाज २' असं मला बोललं गेलं. पण, तसं नव्हतं. आरबाज आणि मी आम्ही दोघेही खूप वेगळे आहोत. मला 'अरबाज २' असा टॅग पडला याच मला वाईट वाटतं. तो टॅग पुसण्याचा प्रयत्न केला. नॉमिनेशमध्ये स्व:ताला वाचवू शकलो नाही. घरात मी सगळ्यांसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. ईरीनासोबत माझं वेगळं कनेक्शन झालं होतं. जान्हवी, ईरीना आणि अरबाज या तिघांना मी बेस्ट फ्रेंड म्हणू शकतो".

'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर येताच 'राजश्री मराठी'शी बोलताना वैभव म्हणाला, 'मला वाटतंय माझा ग्रुप चुकला. नक्कीच मी हे म्हणून शकतो. कारण मी ज्यांना जास्त रिलेट करत होतो, अशा ग्रुपमध्ये न जाता ज्यांना मी जास्त रिलेट करू शकत नाही अशा ग्रुपमध्ये मी होते. पुढे जाऊन कशा गोष्टी फिरतील आणि पलटतील, हे मला माहिती नव्हतं".

सध्या बिग बॉसच्या घरात जान्हवी, धनंजय, पॅडी, अरबाज, सुरज , संग्राम चौगुले, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, आणि अंकिता प्रभू- वालावलकर हे सदस्य उरले आहेत. तर आतापर्यंत योगिता चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरोडे, आर्या जाधव, वैभव चव्हाण, कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील, इरिना रुडाकोवा हे घराबाहेर पडले. मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी' तुम्ही रात्री 9 वाजता एकाच वेळी JioCinema Premium आणि @colorsmarathi वर पाहू शकता. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी