Join us  

सहा वर्षांची असताना आईचं निधन, वडिलांनी सोडलं वाऱ्यावर; वडापाव गर्लची शोकांतिका, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 9:57 AM

चंद्रिकाने 'बिग बॉस'च्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.  'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर बोलताना तिच्या वडिलांबाबत खुलासा केला.

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितही सहभागी झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाला पाहून चाहतेही हैराण झाले होते. चंद्रिका दीक्षित 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. अलिकडेच चंद्रिकाने 'बिग बॉस'च्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर बोलताना तिच्या वडिलांबाबत खुलासा केला. २०२२ मध्ये चंद्रिकाच्या वडिलांचं निधन झालं तर लहानपणीच तिच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं. आईच्या निधनानंतर वडिलांनी ३-४ लग्न केल्याचा खुलासा चंद्रिकाने केला. चंद्रिका सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर ती वडिलांबरोबर राहत नव्हती, असं चंद्रिकाने सांगितलं. त्यानंतर रणवीरने चंद्रिकाला "आईवडिलांशिवाय तुझं संगोपन कोणी केलं?" असं विचारलं. त्यावर चंद्रिकाने उत्तर देताना वडिलांबाबत खुलासा केला. 

चंद्रिका म्हणाली, "आईचा मृत्यू झाल्यानंतर वडील नशेच्या आहारी गेले होते. ते मला कोणत्याही नातेवाईकाकडे सोडून जायचे. आईच्या निधनानंतर वडिलांनी ४-५ लग्न केली. त्यांनी कधीच मला विचारलंदेखील नाही". चंद्रिकाचं हे बोलणं ऐकून रणवीरदेखील आश्चर्यचकित झाला. त्यावर चंद्रिकाने त्याला म्हणाली की हेच सत्य आहे. "मी माझ्या वडिलांचा तिरस्कार करते. जेव्हा मला त्यांची सगळ्यात जास्त गरज होती. तेव्हा ते माझ्याबरोबर नव्हते," असंही तिने सांगितलं. आईच्या निधनानंतर आजीने सांभाळ केल्याचा खुलासाही चंद्रिकाने केला. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार