Join us  

Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा

By तेजल गावडे | Published: February 12, 2022 2:32 PM

अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) याने 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने 'लोकमत'शी बोलताना केला आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोचा भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवले. या शोमधून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (Sagar Karande) हे कलाकार घराघरात पोहचले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande)याने हा शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.  मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने लोकमतशी बोलताना केला आहे. त्याने या चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

अभिनेता सागर कारंडे सध्या चला हवा येऊ द्या या शो व्यतिरिक्त 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' आणि 'इशारो इशारो में' या नाटकात काम करताना दिसतो आहे. नाटकांच्या प्रयोगांमुळे त्याने शो सोडला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र याबाबतचा खुलासा सागर कारंडेने नुकताच केला आहे.

तो म्हणाला की, ही निव्वळ अफवा आहे. या वृत्तात अजिबात तथ्य नाही. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत, कारण लोकांना त्यादिवशी सुट्टी नसल्यामुळे ते प्रयोग पाहायला येत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील. माझे नाटक आणि शो या दोन्हीचे काम अगदी सुरळीत सुरू आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या