Join us

अभिमन्यू सर - गौरीचं धूमधडाक्यात लग्न होणार! 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 4:49 PM

सुबोध भावे-शिवानी सोनारच्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण येणार आहे (tu bhetashi navyane)

सध्या सोनी मराठीवरील 'तू भेटशी नव्याने' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.  प्रेक्षकांनी मालिकेवर खूप प्रेम केलंय. अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष  नोकझोक आणि माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.  ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही AI मालिका  नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. AI वर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. या मालिकेत आता रंजक वळण येणार आहे.

 तू भेटशी नव्याने मालिकेत रंजक वळण

'तू भेटशी नव्याने' मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिमन्यू सर आणि गौरी यांचं लग्न पार पडणार आहे. वयाचं अंतर दूर सारून अभिमन्यू आणि गौरी यांचं लग्न होणार आहे.  अभिमन्यू आणि गौरी यांची मनं लग्नानंतर जुळतील का? मालिका रंजक वळणावर आली असून मालिकेत गौरीचं लग्न ठरलं आहे, पण ते राघवसोबत.  गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. पण राघवचा नक्की बेत काय आहे, आहे, हे अद्याप उघडकीस आलं नाही. मात्र अभिमन्यूला हे कळणार का, आणि तो गौरीला या जाळ्यातून कसा बाहेर काढणार का, हे या लग्नसोहळ्यातून आपल्याला पाहायला मिळेल. अभिमन्यू हा पूर्वीपासूनच तन्वीच्या प्रेमात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते आहेच. पण तिच्यासारख्याच दिसणाऱ्या गौरीसोबत तो विवाहबंधनात कसा अडकणार, हे आता मालिकेत पाहता येईल.

अभिमन्यू आणि गौरी यांची जोडी लग्न कसं करणार, हे पाहण्यासाठी आपल्याला 'तू भेटशी नव्याने' ही मालिका पाहावी लागेल. गौरी आणि अभिमन्यू यांच्या लग्नावर रागिणीची प्रतिक्रिया कशी असेल, हे पाहणे मजेशीर असणार आहे, कारण तिचे अभिमन्यूवर असलेले प्रेम आहे आणि ती गौरीचा तिरस्कार करते. त्यामुळे या गोष्टीत आणखी कशी रंगत येणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. ऐन चाळिशीत असलेले अभिमन्यू सर आणि त्यांच्या कॉलेजमधील गौरी यांचा विवाह कसा पार पडणार, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेचा विवाहसोहळा विशेष भाग सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर बघायला मिळेल.

टॅग्स :सुबोध भावे मराठीमराठी अभिनेता