Join us

बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 4:14 PM

गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉस १८ मधून बाहेर आल्यावर केलेलं विधान चर्चेत आहे (bigg boss 18, gunratna sadavarte)

'बिग बॉस १८' ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. तो स्पर्धक म्हणजे गुणरत्न सदावर्ते.गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या खास स्टाईलने Bigg Boss 18 चं घर चांगलंच गाजवलं. Bigg Boss 18 च्या घरात फक्त दोन आठवडे मुक्काम करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंची खूप चर्चा झाली. आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर लोकमत फिल्मीला दिलेला मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

गुणरत्न सदावर्ते घराबाहेर आल्यावर काय म्हणाले?

Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "मुद्दा लक्षात घ्या. आम्ही जे बाहेर आहोत ते काल आहोत, आज आहोत आणि तेच उद्या राहणार आहोत. बिग बॉसमधून मला तेवढ्या दिवसात बाहेर येणं आवश्यकच होतं. आपण न्यायालयाचे मनसुबे सुद्धा ओळखले असतील. आपण सर्व माध्यमांनी दाखवलं की महत्वाची केस आहे. झालं असं की, मी त्या तारखेला बाहेर यायचं असं अॅग्रीमेंटमध्ये होतं."

सदावर्ते पुढे म्हणाले, "दुसरी गोष्ट बिग बॉसच्या घरात काही प्रॉब्लेम होता का? तर तुम्ही सलमानशी बोलताना पण पाहिलं असेल की, तिकडचे कलाकार स्ट्रगलर आहेत. ती सर्व स्ट्रगल करणारी मंडळी आहेत. म्हणून मी त्यांना चांगलं असं नाव दिलं. उबले चने फ्यूचर हिरो. ते सर्व मला उबले चने फ्यूचर हिरो वाटायचे. त्या सर्व बिचाऱ्यांनी माझ्याकडून योगा शिकले. हनुमान चालिसाची बैठक कशी लावायची ते शिकले. किर्तन करायचं ते शिकले. त्यातल्या त्यात जेलचा संघर्ष कसा करावा या गोष्टीही ते शिकले. त्यांनाही माझ्यामुळे लोकशाही समजली. घरातील १७ जणांना माझ्याविषयी अनास्था होती असं बिलकूल नाही. कोणासाठी तो रोमान्स होता, कोणासाठी ते निव्वळ एंटरटेनमेंट होतं. माझ्यासारख्या सोशो-पॉलिटिकल कार्यकर्त्यासाठी ते काहीतरी वेगळं होतं. "

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्ते