Join us  

'ठरलं तर मग' मालिकेची वेळ बदलणार?; चाहत्याच्या प्रश्नावर जुई म्हणते, 'असा प्रश्न येतोच...?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:33 PM

जुई गडकरीने मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (tharla tar mag) ही सर्वांची आवडती मालिका. यातील सायली अर्जुनची जोडी तर प्रेक्षकांची अगदी लाडकी आहे. त्यांच्या केमिस्ट्री मालिका नंबर वनवर आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आहे. नवीन प्रोमोनुसार प्रतिमाची वाचा परत आली आहे. त्यामुळे आता प्रियाचं सत्य समोर येणार का हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान मालिक? असा प्रश्न एका चाहत्याला पडला असता जुई गडकरीने त्याला उत्तर दिलं आहे.

जुई गडकरीने मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे. जुई अनेकदा तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते.  काही दिवसांपूर्वीच तिच्या कानाची सर्जरी झाली. तेव्हा मालिका बंद होत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. जुईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सगळ्या अफवा आहेत हे स्पष्ट केलं. आता नुकतंच एका चाहत्याने मालिकेची वेळ बदलत आहे का? असा प्रश्न विचारला. याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुईने लिहिले, "असं काहीही नाहीये. प्लीज उगाचंच असले प्रश्न नकोत. आणि मुळात हा प्रश्नच का येतोय?"

'ठरलं तर मग' मालिका टीआरपीमध्ये सुरुवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार प्रवाहवर आणखी दोन नवीन मालिका सुरु होत आहेत. त्यामुळे जुन्या मालिकांच्या वेळ बदलणार का असे प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. मात्र जुईने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'ठरलं तर मग' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मालिकेने आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त एपिसोड पूर्ण केले आहेत. 

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडिया