Join us  

25 लाख रुपये जिंकले पण 50 लाखाच्या प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 12:01 PM

शालिनी शर्मा या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्या होत्या. तेराव्या  प्रश्नापर्यंत शालिनी यांनी अचूक उत्तर दिलं. पण 14 प्रश्नावर येऊन त्या अडखळल्या.

Kaun Banega Crorepati 16 :  नेहमीच चर्चेत असणारा 'कौन बनेगा करोडपती'  या कार्यक्रमाच्या नव्या सीझनची सुरुवात झाली आहे. नेहमी प्रमाणेच अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा हा शो होस्ट करताना दिसत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत. KBC 16 च्या मंचावर एक महिला स्पर्धक सहभागी झाल्या. शालिनी शर्मा या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्या होत्या. तेराव्या  प्रश्नापर्यंत शालिनी यांनी अचूक उत्तर दिलं. पण 14 प्रश्नावर येऊन त्या अडखळल्या. चला तर तो कोणता प्रश्न होता आणि त्याचं नेमकं उत्तर काय आहे हे जाणून घेऊया.

शालिनी यांनी 25 लाख जिंकल्यानंतर त्यांच्या पुढ्यात 50 लाख रुपयांचा प्रश्न आला. प्रश्न असा होता की, नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी कोणत्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते? या प्रश्नासाठी त्यांसमोर चार पर्याय देण्यात आले. A- एलिझाबेथ डेव्हनपोर्ट,, B- सिल्व्हिया गाँटलेट, C-मेरी डिसोझा, D-बार्बरा वेबस्टर. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते पर्याय ए) एलिझाबेथ डेव्हनपोर्ट. मात्र, शालिनीला या प्रश्नाचे अचूक उत्तर लक्षात आले नाही आणि या प्रश्नावर तिने खेळ सोडून २५ लाख घेण्याचा निर्णय घेतला.

अमिताभ यांच्या KBC 16 च्या या पर्वात नवनवीन स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धकांना बिग बींकडून आव्हानात्मक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तर जाणून घेताना आपल्याही ज्ञानात भर पडत असते. अनेक लोकांसाठी, हा मंच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. या मंचावर जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेने अनेकांचे भविष्य बदलले आहे.  

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चननीरज चोप्रा