Join us  

'कौन बनेगा करोडपती'मध्ये 25 लाख रुपयांसाठी विचारला 'महाभारत'बद्दल प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:24 PM

'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्ट म्हणून परतले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 16' च्या पहिल्या एपिसोडमध्ये गुजरातमधील उत्कर्ष बक्षीला अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.  खेळ सुरू झाल्यावर त्याने बारा प्रश्नापर्यंत अचूक उत्तरे दिली. पण त्याची सुई तेराव्या प्रश्नावर अडकली. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतं का ते पाहा. सध्या हा प्रश्न सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे.

अमिताभ यांनी उत्कर्ष बक्षीला तेरावा प्रश्न महाभारताबद्दल विचारला. अमिताभ बच्चन यांनी विचारले की, "महाभारतानुसार कोणत्या देवाने अंबाला हार भेट दिला आणि सांगितले की जो हा हार घालेल तो भीष्माचा वध करेल?. या प्रश्नावरील उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते. A. भगवान शिव, B. भगवान कार्तिकेय, C. भगवान इंद्र आणि D. भगवान वायु.  या प्रश्नावर उत्कर्षने दोन लाइफलाइन्स वापरल्या होत्या, मात्र त्यानंतरही तो योग्य उत्तर देऊ शकला नाही आणि त्याला 3 लाख 20 हजार रुपयांसह शोचा निरोप घ्यावा लागला.

हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहेमहाभारतात ज्या देवतेने अंबाला माला भेट दिली, ते भगवान कार्तिकेय होते. बरोबर उत्तर दिले असते, तर उत्कर्षने २५ लाख रुपये जिंकले असते.

क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरचा रिअॅलिटी शो  लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात देखील भर घालतो. हा शो सुरू झाल्यापासून भारतातील लोक या मंचावर येण्यास उत्सुक आहेत. अनेक लोकांसाठी, हा मंच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. या मंचावर जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेने अनेकांचे भविष्य बदलले आहे. सध्या या शोचा 16वा सीझन सुरु आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीसेलिब्रिटीमहाभारत