Join us  

Exclusive : एक भेट आणि वर्षभराचा दुरावा..., अशी सुरू झाली होती सुयश-आयुषीची ‘INSTA’ लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 8:00 AM

Suyash Tilak and Aayushi Bhave Lover story : ‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. याच सुयशच्या आयुष्यात आयुषीची एन्ट्री झाली ती 2018 साली....

Suyash Tilak and Aayushi Bhave Lover story  :  अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे ( Aayushi Bhave) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. सोशल मीडिया दोघंही अ‍ॅक्टिव्ह. दोघंही एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. या स्वीट कपलचे अनेक भन्नाट व्हिडीओ, गोड सुंदर फोटो तुम्ही पाहिले असतील पण या जोडप्याची लव्हस्टोरी कशी सुरू झाली ते, तुम्हाला माहितीये का?

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सुयशने त्याच्या व आयुषीच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. पहिली भेट, भेटीनंतरचा दुरावा, प्रेम अन् मग लग्न असा प्रवास त्याने सांगितला.

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जाऊ लागला. याच सुयशच्या आयुष्यात आयुषीची एन्ट्री झाली ती 2018 साली.होय, 2018 साली ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत आयुषी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि सुयश या कार्यक्रमात त्याच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला गेला होता. या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. आयुषी माझ्या आयुष्यात येण्याचं कारण म्हणजे श्रावण क्वीन स्पर्धा, असं आयुष सांगतो तो त्याचमुळे.अर्थात स्पर्धेच्या निमित्ताने भेट झाली असली तरी प्रेम काही लगेच बहरलं नाही. सुयशला आयुषी पहिल्याच नजरेत आवडली होती. पण आयुषीच्या तर सुयश इतका मोठा अभिनेता आहे हे गावीही नव्हतं. श्रावण क्वीन स्पर्धेत जुजबी ओळख झाली होती तेवढीच. कारण त्यानंतर वर्षभर दोघांचही एकमेकांशी काहीही बोलणं नव्हतं. सुयश नावाच्या व्यक्तिला आपण कधी भेटलोय, आयुषीला तर याचाही विसर पडला होता. पण म्हणतात ना, प्रेमाच्या, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधून येतात...

वर्षभरानंतर पुन्हा आयुषी व सुयश भेटले आणि तेही श्रावण क्वीन स्पर्धेच्या निमित्तानेच. होय, सुयश या कार्यक्रमाचा होस्ट होता आणि आयुषीला गतवर्षीची विजेती म्हणून या कार्यक्रमात बोलवलं गेलं होतं. तिथे बºयापैकी ओळख झाली. मग दोघांनीही एकमेकांना इन्स्टावर फॉलो केलं. इन्स्टावर दोघांचंही बोलणं सुरू झालं. अर्थात पुढाकार सुयशनेच घेतला होता. हळहळू  गप्पा सुरू झाल्या. मग मैत्री झाली आणि मग एकदिवस दोघांनी भेटायचं ठरवलं. गणपतीच्या काळात दोघांचीही पहिली भेट झाली. यानंतर काय झालं... यासाठी तुम्हाला सोबतचा व्हिडीओ बघावा लागेल. बघा तर...

टॅग्स :सुयश टिळकमराठी अभिनेताटिव्ही कलाकार