Join us  

अरुण कदम यांना शिक्षा देण्यासाठी वैशाली यांची नरेंद्र मोदींकडे अजब मागणी, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 2:42 PM

वैशाली यांनी गमतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अजबच मागणी करुन टाकली. 

मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं वेगळी छाप उमटवली आहे. लाडका दादूस म्हणून त्यांना ओळखलं जातं.  त्यांनी आपल्या भाषेतील खास मालवणी तडक्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांची विनोदाची स्टाइल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ते आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचले. अरुण कदम आणि त्यांची पत्नी वैशाली कदम यांनी नुकतीच लोकमतच्या फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना वैशाली यांनी गमतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अजबच मागणी करुन टाकली. 

अरुण कदम आणि  वैशाली कदम यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांच्या व्यावसायिक व खाजगी आयुष्यावरसंदर्भात अनेक खुलासे केले. यावेळी  वैशाली कदम यांनी वीजबचतीचे अधोरेखीत केलं. त्या म्हणाल्या, सवयी आणि विसरभोळ्या स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "ते खूप गोष्टी विसरतात. एक तर लाईट बंद करणे ते विसरतात. बाथरुमध्ये दहावेळा जाणार पण मग लाईट बंद नाही करणार'.

पुढे त्या म्हणाल्या, "मी तर म्हणेन मोदींना सांगायला पाहिजे, की जे लाईट नाही बंद करत ना, त्यांना आतंकवादी किंवा देशद्रोही असा किताब द्या. लाईट बंद करणं, वीज वाचवणं म्हत्वाचं आहे. वीज नसेल तर तुम्ही काय करु शकाल. गावांमध्ये पाहा ना काय परिस्थिती आहे. आपल्याकडे आहे म्हणून आपण कसही वापरायचं असं नाही".  

अरुण कदम अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांना सुकन्या ही मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वीच सुकन्या आई झाली आहे. अरुण कदम त्यांच्या नातवाबरोबरचे व्हिडिओ शेअर करत असतात.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कलेच्या बळावपर प्रेक्षकांना आपलंसं केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. 

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनमहाराष्ट्राची हास्य जत्रानरेंद्र मोदीवीज