Join us  

मराठमोळ्या अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण, नव्या घराच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:50 PM

'मन झालं बाजिंद' या मालिकेतील अभिनेत्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हक्काचे घर खरेदी करून त्यांचं स्वप्न पूर्ण केले आहे. रुपाली भोसले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच आता झी मराठीवरील मालिकेतील अभिनेत्याने मुंबईत घर घेतले आहे. झी मराठीची मन झालं बाजिंद या मालिकेतील अभिनेत्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

मन झालं बाजिंद मालिकेतील गुली मावशीचा मुलगा हृतिक म्हणजेच अभिनेता रियाझ मुलानी याने नुकतेच मुंबईत हक्काचे घर घेतले आहे. स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत आलो तेव्हाच ठरवलं होतं की आपल्या हक्काच्या घरावर क्लॅप बोर्डची नेमप्लेट लावावी ज्याच्यावर आपल्या कुटुंबाचे नाव असावे. वेळ लागतो पण पाहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होते. आई वडील आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले. असे म्हणत रियाझने त्याच्या या नवीन घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या घराची ही खास नेमप्लेट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रियाझ मुलानी हा मूळचा पुण्यातील इंदापूरचा. आय एम सॉरी, यारों की यारी,पोलीस लाईन, मन झालं बाजिंद या प्रोजेक्टमध्ये तो काम करताना दिसला आहे.  

टॅग्स :झी मराठी