Join us  

इतक्यात मूड बदलणं सोपं नाही बरं का! जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 1:57 PM

यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चर्चेचा विषय ठरलाय.

Bigg Boss Marathi Season 5: यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चर्चेचा विषय ठरलाय. दिवसेंदिवस या कार्यक्रमामध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यामध्ये निक्की तांबोळी आणि वर्षाताईंमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर घरातील इतर सदस्यांकडूनही वर्षा उसगावकरांचा वारंवार अपमान करण्यात आला. त्यानंतर वैभव चव्हाण तसेच जान्हवी किल्लेकर यांची वर्षा उसगावकर यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अशातच वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकरमध्ये झालेल्या वादाला आता तोंड फुटले आहे. 

पहिल्याच आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्की तांबोळीची शाळा घेतल्यानंतर तिच्या वागण्यात थोडा बदल झाला. त्यानंतर जान्हवीचा पार चढला. तिने तर अक्षरश: आपल्या बोलण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. काल दुसऱ्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीचाही खरपुस समाचार घेतला. त्यानंतर घडल्या प्रकारानंतर जान्हवी किल्लेकरला भोवळ आली. त्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी संतप्त पोस्ट केली आहे. 

मागील आठवड्यामध्ये कल्ला टीव्हीमध्ये प्रत्येक सदस्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये खटकलं. त्यावेळी जान्हवीने वर्षाताईंचा अभिनय आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटला. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी जान्हवीच्या वर्तवणुकीवर संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणाल्या सुरेखा कुडची?

दरम्यान, सोशल मीडियावर सुरेखा कुडची यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहलंय, "रितेशने आज एकीला झापलं. वर्षा उसगावकर यांना वाईट बोलल्यानंतर तेव्हा डोळ्यातून २ टिपुस ही ओघळले नाहीत. पण, वाईट वाटल्याची अ‍ॅक्टिंग भारी होती. थोड्या वेळाने अक्षय कुमार आले आणि मग मस्करीचा मूड झाला. त्याचवेळी जेव्हा चुगली सांगितली तेव्हा रितेशलाही खोटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला".

पुढे त्या म्हणाल्या, "त्यावेळी आपल्या भाऊने भाऊचा धक्का दाखवला. ते मला खूप आवडलं.  पण त्यानंतर मूड, चेहऱ्यावरचा रंग जो काही उडाला होता आरारा. ब्रेकमध्ये रडून झालं अचानक पॅनिक अटॅक आला. त्याचं कारण आता निकीनी सोडलं तर तिला समजलं तर हे होतं. त्यानंतर थोड्या वेळाने परत डान्स देखील केला. हा संपूर्ण एपिसोड अर्ध्या दिवसात शूट केला जातो आणि इतक्यात इतके मूड बदलणे सोप नाही बरं का!" अशा तिखट शब्दात सुरेखा कुडची यांनी जान्हवीला टोला लगावला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल