Join us  

'माझ्या चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला'; मीडियासमोर अनिरुद्ध मागणार अरुंधतीची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 4:32 PM

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध जाणूनबुजून मीडियासमोर अरुंधतीची माफी मागतो.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही स्टार प्रवाहवरील (star pravah) मालिका सध्या विविध कारणांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनिरुद्धपासून विभक्त झालेली अरुंधती सुखाने तिचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अरुंधतीला नात्यातून मोकळं केल्यानंतरही अनिरुद्ध तिची पाठ सोडायला तयार नाही. तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर तिच्या विरोधात नवनवीन डाव रचतोय. यामध्येच आता अनिरुद्ध जाहीरपणे अरुंधतीची माफी मागणार आहे.

अरुंधतीने कधीही तिच्या पायावर स्वतंत्रपणे उभं राहू नये, ती कायम संसारात गुंतलेली असावी अशी अनिरुद्धची इच्छा आहे. त्यामुळे घटस्फोटानंतरही तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा निर्माण करतोय. परंतु, यावेळी तो मोठ्या शिताफीने डाव आखताना दिसत आहे.  अरुंधतीसोबत अत्यंत प्रेमाने वागून तो त्याचा डाव साध्य करताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध जाणूनबुजून मीडियासमोर अरुंधतीची माफी मागतो. माझ्या एका चुकीमुळे आमच्या २५ वर्षांचा संसार मोडला, असं म्हणत तो अरुंधतीची माफी मागतो. 

दरम्यान, अनिरुद्धच्या या माफीमागे त्याची नेमकी कोणती योजना किंवा कोणता प्लॅन आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे अनिरुद्धच्या नव्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमधुराणी प्रभुलकरमिलिंद गवळी