Join us  

ऐन लग्नात अनिरुद्ध दाखवणार आशुतोषला बाहेरचा रस्ता; अरुंधती पहिल्यांदाच घेणार मित्राची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 12:24 PM

Aai kuthe kay karte: ऐन लग्नात अनिरुद्ध आणि आशुतोषमध्ये भांडण होणार आहे. ज्यामुळे आशुतोषला भरलग्नातून बाहेर जावं लागणार आहे. 

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अभिच्या लग्नाची गडबड सुरु आहे. लवकरच अभिषेक आणि अनघा लग्नगाठ बांधणार आहेत. आतापर्यंत देशमुखांच्या घरात हळद, संगीत, मेहंदी असे सारे सोहळे दिमाखात पार पडले. विशेष म्हणजे यावेळी घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या आनंदावर लवकरच विरजण पडणार आहे. ऐन लग्नात अनिरुद्ध आणि आशुतोषमध्ये भांडण होणार आहे. ज्यामुळे आशुतोषला भरलग्नातून बाहेर जावं लागणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभि-अनघाच्या लग्नात पुन्हा नवं संकट उभं राहणार आहे.  हा लग्नसोहळा सगळे एन्जॉय करत असतानाच अनिरुद्ध आशुतोषसोबत शाब्दिक वाद घालणार आहे. इतकंच नाही तर भर मांडवातून तो आशुतोषला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. परंतु, यावेळी पहिल्यांदाच अरुंधती तिच्या मित्राची म्हणजे आशुतोषची बाजू घेऊन अनिरुद्धला खडे बोल सुनावणार आहे. 

दरम्यान, अरुंधती आणि आशुतोषमध्ये निर्माण होत असलेली मैत्री पाहून अनिरुद्धला प्रचंड संताप येत असल्याचं दिसून येतं. मुळात त्यांच्यातील मैत्री त्याला मान्य नाही. त्यामुळे अनेकदा तो आशुतोषचा अपमान करताना दिसतो. परंतु, यावेळी तो अभिच्या लग्नातूनच त्याला बाहेर काढणार असल्यामुळे या मालिकेला रंजक वळण मिळणार हे दिसून येत आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमिलिंद गवळी