Join us  

माझी तुझी रेशीमगाठ: विश्वजीतने केला मिथीलाचा पत्नी म्हणून स्वीकार; मालिकेत होणार नव्या नात्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:54 AM

Mazi tuzi reshimgath: रागात विश्वजीत एका बारमध्ये भांडण करतो. तसंच बारचं नुकसानही करतो. त्यामुळे सगळेच जण विश्वजीतच्या या स्वभावावर चिडतात. मात्र, या प्रसंगी मिथीला त्याला सावरायचा प्रयत्न करते.

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे. चौधरी कुटुंबात नेहा आणि परीचा समावेश झाल्यानंतर पॅलेसचं रुप अगदी पालटून गेलं होतं. पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र कुटुंबाप्रमाणे राहू लागलं होतं. मात्र, परी आणि नेहाचं सत्य आजोबांसमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. आजोबांनी यश आणि नेहासोबत अबोला धरला आहे. तर, दुसरीकडे विश्वजीत आणि मिथीला यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत.

आजोबा आणि यश यांच्यात गैरसमज निर्माण झाल्यानंतर दुखावलेला यश पॅलेस सोडून नेहासोबत तिच्या चाळीत राहायला जातो. तर, दुसरीकडे यश घर सोडून गेल्यामुळे मिथीला आणि विश्वजीत हवालदिल होतात. यशने पुन्हा घरी परत यावं यासाठी दोघंही कसोशीने प्रयत्न करतात. मात्र, यश घरी यायला तयार नसतो. याच रागात विश्वजीत एका बारमध्ये भांडण करतो. तसंच बारचं नुकसानही करतो. त्यामुळे सगळेच जण विश्वजीतच्या या स्वभावावर चिडतात. मात्र, या प्रसंगी मिथीला त्याला सावरायचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत तुमची साथ देईन असंही सांगते. त्यामुळे विश्वजीतला तिचा खरा स्वभाव कळतो आणि तो तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो.

दरम्यान, मिथीलाचे हे शब्द ऐकल्यानंतर विश्वजीतला तिचा खरा स्वभाव कळतो. इतकंच नाही तर मिथीलाचं खरंच आपल्यावर प्रेम आहे याची जाणीव होते. त्यामुळे तो मिथीलाचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. म्हणूनच सध्या मालिकेत एक नातं बहरताना दिसत आहे. तर, दुसरीकडे आजोबा आणि यश यांच्या नात्यातील दरी आणखी खोल होत आहे. त्यामुळे येत्या भागात या मालिकेत काय घटना हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार