Join us

​चाहूल मालिकेमध्ये निर्मला होणार भोसले वाड्यामध्ये बंदिस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2017 10:18 AM

चाहूल मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच काही घटना घडत आहेत. या घटनांमुळे भोसले वाड्यामधील सदस्यांसोबतच शांभवीदेखील टेन्शनमध्ये आली आहे. ...

चाहूल मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच काही घटना घडत आहेत. या घटनांमुळे भोसले वाड्यामधील सदस्यांसोबतच शांभवीदेखील टेन्शनमध्ये आली आहे. सर्जाला वाड्यामधील भुताने झपाटले होते. त्यानंतर सर्जाच्या वडिलांचा म्हणजेच यशवंतचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनांनी वाड्यामध्ये एकप्रकारची शांतता पसरली होती. याच दरम्यान शांभवीने या वाड्यामधील भुताला मात देण्यासाठी एक सापळा रचला. ती वाड्यातील भुताला कशी मात देणार? भूत भोसल्यांचा पाठलाग करणे सोडणार का? शांभवीला अखेर विजय मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.शांभवी आता स्वत:च्या मनाशी ठरवल्याप्रमाणे वाड्यातील सगळ्यांची माफी मागणार आहे. यानंतर आता ती भोसले वाडा सोडून जाईल असे निर्मलाला वाटले होते. पण शांभवी माफी मागून भोसले कुटुंबाला भोसले वाडा सोडून जाण्यास तयार करणार आहे. निर्मला हे सगळे बघून खूप अस्वस्थ होणार आहे. कारण यामुळे सर्जा तिच्यापासून दूर होणार हे तिला कळून चुकले आहे. शांभवी निर्मलाला जाळ्यात अडकवून वाड्यामध्ये बंदिस्त करण्यात सफल होणार आहे. पण निर्मलाची आता कोंडी झाली आहे कारण तिला कुठूनही मदत मिळत नाहीये. भोसले कुटुंब वाडा सोडून आता दुसऱ्या वाड्यामध्ये राहण्यास सुरुवात देखील करणार आहेत. शांभवीने भुताला वाड्यामध्ये बंदिस्त केले आहे. त्यामुळे आपण या वाड्यामध्ये सुरक्षित राहू शकतो असे सगळ्यांना वाटत आहे. पण वाडा सोडून जायची सर्जाची इच्छा नाहीये. वाड्यातील भूत तुम्हाला त्रास देणार नाही. त्यामुळे मी आता जाऊ शकते असे शांभवी सगळ्यांना सांगणार आहे. पण नव्या वाड्यात जायचे की नाही या द्विधा मनस्थितीत सर्जा अडकला आहे तर दुसरीकडे निर्मला वाड्यामधून निघण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे तिला बाहेर पडायला सर्जाची नकळत मदत मिळणार का हे बघणे आता रंजक ठरणार आहे.Also Read : ​चाहुल मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार भूत