Join us  

"मला लग्न, कमिटमेंट या गोष्टी...", अखेर प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:46 PM

प्राजक्ताने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याबरोबरच लग्नाची भीती वाटत असल्याचा खुलासाही तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्याने प्राजक्ता चाहत्यांच्या मनाचा ठेका घेते. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेने प्राजक्ताला प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. प्राजक्ताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांना रिअल लाइफ आणि करिअरमधील अपडेट देत असते. 

करिअरमध्ये यशाचं शिखर गाठलेली प्राजक्ता रिअल लाइफमध्ये मात्र अद्याप सिंगल आहे. अनेकदा प्राजक्ताला तिच्या लव्हलाइफबद्दल विचारण्यात आलं आहे. एका मुलाखतीत तिने प्रेमात पडल्याचा खुलासाही केला होता. अनेकांची क्रश असलेली प्राजक्ता लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर देत प्राजक्ताने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याबरोबरच लग्नाची भीती वाटत असल्याचा खुलासाही तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

प्राजक्ताने नुकतीच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेल मुलाखत दिली. या मुलाखतीत लव्ह लाइफ आणि लग्नाबाबत प्राजक्ता म्हणाली, "मी प्रेमात पडते. पण, मला लग्न, कमिटमेंटची भीती वाटते. कारण, मला सिंगल राहायला आवडतं आणि स्वत:ची कंपनी मी एन्जॉय करते. २०१३ पासून मी मुंबईत एकटी राहतेय. त्यामुळे त्या स्वांतत्र्याची मला सवय लागलीये. एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे. त्यामुळे मला बंधनात अडकण्याची थोडी भीती वाटते. आता लग्नसंस्था ज्याप्रकारे विस्कळीत होत चालली आहे. त्यामुळे जास्त भीती वाटते. मी प्रेमात पडली आहे. पण, मला कळलं की समोरचा मुलगा माती खातोय. त्यामुळे मग मी २-३ वेळा माघार घेतलेली आहे".  

सुवासिनी मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलेल्या प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला सावधान मालिकांमध्येही काम केलं. चंद्रमुखी, तीन अडकून सीताराम, लकडाऊन बी पॉझिटिव्ह, पांडू, खो खो, तांदळा या सिनेमांत ती झळकली आहे. प्राजक्ताने रानबाझार या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीटिव्ही कलाकार