Join us  

"आम्ही ५० मीटरवरुन पळत आलेलो कारण..."; निक्की-आर्याच्या 'थप्पड' प्रकरणाचा साक्षीदार संग्रामचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 8:51 AM

बिग बॉस मराठीमधून बाहेर आलेला संग्राम चौगुलेने त्या दिवशी घरात काय घडलं याचा खुलासा केलाय (sangram choughule, bigg boss marathi 5)

सध्या बिग बॉस मराठीची चांगलीच चर्चा आहे. यंदाचा सीझन अनेक कारणांनी गाजतोय. बिग बॉसचा हा नवीन सीझन संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. रविवारी ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रंगणार आहे. या सीझनमध्ये सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे आर्या आणि निक्कीचा थप्पड कांड. आर्याने निक्कीच्या जोरात कानशिलात लगावली होती. परिणामी आर्याला घर सोडावं लागलं होतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा खुलासा त्यावेळचा साक्षीदार संग्राम चौगुलेने केलाय.

संग्रामने सांगितलं नेमकं काय घडलं

रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत संग्रामने याविषयी खुलासा केलाय. संग्राम म्हणाला, "त्यावेळी घरातल्या कॅप्टनचा निर्णय होणार होता. भांडणं करता करता काय झालं की, दरवाजा बंद झाला होता. निक्की दरवाजा ढकलत होती. दरवाजा ढकलत असताना निक्कीने मारायचा प्रयत्न केला. आणि नेमका दरवाजा ढकलताना निक्कीचा हात आर्याच्या गालाला लागला. त्यामुळे आर्याला वाटलं की, निक्कीने मारलं तिला. पण कॅमेरापुढे काय दिसेल माहित नाही ना."

 

संग्राम पुढे म्हणाला, "निक्कीचा हात लागल्यावर आर्याने अशी फाडकन मारली होती ना! मला आठवतंय आम्ही ५० मीटरवरुन पळत आलो होतो. एवढ्या जोरात मारली होती. नंतर सगळ्यांनी आर्याला विचारलं तिने आधी मारलं की तू मारलं. आर्या म्हणाली तिने मारलं." अशाप्रकारे संग्रामने त्या दिवशी काय झालं याचा खुलासा केलाय. आर्याला कानफडात मारल्याने बिग बॉसने तिला घराबाहेर काढलं लोकांनी मात्र आर्याला चांगलाच सपोर्ट केलेला दिसला.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन