Join us  

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; रेवामुळे अक्षयचा जीव धोक्यात? Promo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:16 AM

मुरांबा मालिकेत नक्की काय घडतंय?

स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' (Muramba) मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सर्वांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे. तर नवोदित अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमा या मुख्य भूमिकेत आहे. तसंच आणखी एक नवोदित अभिनेत्री निशानी बोरुले मालिकेत रेवा ही खलनायिका आहे. दरम्यान मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुरांबा मालिकेत आरती या पात्राचा जीव जातो. रेवानेच आरती वहिनीला मारलं असल्याचा अक्षयला संशय असतो. यामुळे अक्षय पुरावे शोधत असतो. मालिकेतला ट्विस्ट असा की अक्षयचाच जीव आता धोक्यात आला आहे. घराच्या टेरेसवर जाऊन अक्षय आणि रेवा दोघांमध्ये बाचाबाची होते. अक्षय रेवाला हे मान्य करायला लावायला प्रयत्न करतो की तिनेच आरतीला मारलं आहे. मात्र आता अक्षयचाच जीव धोक्यात आला आहे. तो टेरेसाच्या कठड्याला हात धरुन लटकतो. रेवा त्याची मदतही करत नाही उलट आरतीला मीच मारलं आता तुलाही मारणार असंही ती म्हणते. दुसरीकडे रमा देवासमोर दिवा लावत असताना कुंकू सांडतं. तेव्हा ती अक्षयच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करते. खरंच अक्षयचा जीव जातो की आणखी काही होतं हे पाहणं आता पुढे महत्वाचं असणार आहे.

दरम्यान सध्या 'मुरांबा' मालिकेवर प्रेक्षक वैतागले आहेत. कमेंट्समध्ये मालिका कंटाळवाणी झाली असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या अनेक मालिकांबाबतीत प्रेक्षक हीच तक्रार करत आहेत. मुरांबा मालिकेची सुरुवात खूप चांगली झाली पण आता याकडे प्रेक्षक दिवसेंदिवस पाठ फिरवत आहेत. आता हा ट्विस्ट प्रेक्षकांना पुन्हा मालिकेकडे वळवतो का हेही पाहणं महत्वाचं आहे.

टॅग्स :स्टार प्रवाहटिव्ही कलाकारशशांक केतकरमराठी अभिनेताटेलिव्हिजन