Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, गौरी करणार अनिलचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 2:43 PM

Sukh Mhanje Nakki Kay Asata:'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. तिला कड्यावरून ढकलणाऱ्या जयदीपबाबतचे सत्य अखेर समोर येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलले होते. त्यानंतर माईंच्या साथीने गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात आली आहे. आता ती शालिनी आणि मानसीला चांगलंच वठणीवर आणणार आहे. दरम्यान आता गौरीला समजते की तिला कड्यावरून ढकलणारा जयदीप नसतो तर त्याचा रुप धारण केलेला अनिल असतो.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. रंगपंचमीला जयदीपच्या वेशात अनिल तिथे येतो. गौरी जयदीप, शालिनी आणि देवकी यांना एकत्र बोलताना पाहते. त्यामुळे जयदीप यांच्यासोबत कटात का सामील झाला आहे, याचा शोध गौरी माईच्या मदतीने घ्यायचे ठरविते. दरम्यान होलिका दहनच्या वेळी शालिनी गुलालात मसाला मिक्स करते. गौरीला हे समजते. माई दादांना गुलाल लावणार इतक्यात तिथे गौरी येते आणि दादांना ढकलते. ती दादांना ढकलते म्हणून सगळे गौरीवर चिडतात. मात्र शालिनीने गुलालात मसाला मिक्स केल्याचे गौरी सांगते. हे देवकीकडून खरे आहे हे वदवून घेते. मात्र शालिनी त्यावेळी तिला तूला बघून घेईन असे सांगते.दरम्यान रंगपंचमीला जयदीपला बेशुद्ध करून कोंडून ठेवतात. त्याच्या जागी आता अनिल शिर्के पाटीलच्या घरी जयदीपच्या जागी जाणार आहे.

मराठी सीरियल्सच्या रिपोर्टनुसार, गौरीला शालिनी आणि अनिलचा सगळा प्लान कळणार आहे. त्यामुळे तिला कड्यावरून ढकलणारा जयदीप नसून अनिल असतो हेदेखील तिला कळते. त्यामुळे शालिनीच्या तावडीतून जयदीपला गौरी सोडून आणणार आहे. तसेच गौरी शालिनी आणि अनिलचा पर्दाफाश करणार आहे.  शिर्के पाटील कुटुंबाला जेव्हा शालिनी आणि अनिलचा प्लान कळेल तेव्हा ते काय करतील हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह