Join us  

​या मालिकेचे टायटल साँग बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 4:02 PM

मालिकेचे टायटल साँग हे मालिकेचा एक अविभाज्य घटक असतो. मालिकेचा आशय प्रेक्षकांना या टायटल साँगमधून कळतो.  त्यामुळे मालिकेची टीम ...

मालिकेचे टायटल साँग हे मालिकेचा एक अविभाज्य घटक असतो. मालिकेचा आशय प्रेक्षकांना या टायटल साँगमधून कळतो.  त्यामुळे मालिकेची टीम टायटल साँगवरही खूप मेहनत घेत असते. सध्या अनेक मालिकांचे टायटल साँग प्रसिद्ध बॉलिवूड गायक गात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिका सुरू झाल्यानंतर मालिकेचे जे टायटल साँग असते, तेच अनेकवेळा शेवटपर्यंत असते. पण जाना ना दिल से दूर या मालिकेचे टायटल साँग बदलण्याचा निर्णय मालिकेच्या टीमने घेतला आहे.या मालिकेच्या कथानकाला नुकतीच एक कलाटणी मिळाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यामुऴे आता मालिकेत पुढे काय होईल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहाता प्रेक्षकांसमोर आणखी काही चांगल्या गोष्टी सादर करायचे या मालिकेच्या टीमने ठरवले आहे. या मालिकेच्या नव्या कथानकानुसार आता या मालिकेचे टायटल साँग असावे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मालिकेचे नवे टायटल साँग नुकतेच अरमान मलिक आणि पलक मुच्छाल यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. रविश आणि विविध यांच्या नात्यात झालेले बदल या टायटल साँगमधून दाखवण्यात येणार आहेत. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शशांक व्यास आणि शिवानी सुर्वे या नवीन टायटल साँगसाठी खूप उत्सुक आहेत. या गाण्याचे रेकॉर्डिंग करताना अरमान त्याच्या जुन्या आठवणीत रमला होता. हे गाणे गाताना त्याच्यासमोर त्याच्या प्रेयसीचा चेहरा उभा राहिला होता. त्यामुळे हे गाणे त्याने अधिक चांगल्याप्रकारे गायले.