Join us

"आज आनंदीचा प्रवास इथेच संपतोय पण...", दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेनं घेतला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:53 AM

Divya Pugaonkar : अभिनेत्री दिव्या पुगावकरने सोशल मीडियावर 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेसंदर्भात एक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava). या मालिकेतील आनंदी आणि सार्थकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) हिने साकारली होती. १० ऑक्टोबर रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकरने सोशल मीडियावर मालिकेसंदर्भात एक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आली आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकरने मालिकेच्या संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज आनंदीचा प्रवास इथेच संपतोय पण दिव्या तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पात्रांद्वारे भेटायला येत राहील. अजूनपर्यंत जे प्रेम आणि आशिर्वाद देत आलात ते पुढेही कायम असू द्या… 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियातिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, तुला खूप मिस करू ताई मन धागा धागा जोडते नवा आनंदी ताई तू नव्या रुपात येशील पण तुझ हे आनंदी बेस्टच होती. दुसऱ्या युजरने सांगितले की, खूप छान सिरीयल होती लवकर निरोप घेतला आम्ही तुम्हाला सगळ्यांना मिस करू. आणखी एकाने लिहिले की, मनापासून जोडलेले धागे हे कायम टिकून राहतात अगदी तसेच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांशी जे मनोरंजनाचे धागे जोडले ते रसिक प्रेक्षकांच्या चिरकाल स्मरणात राहतील. 

असा झाला मालिकेचा शेवटमन धागा धागा जोडते नवा मालिकेत सार्थकच्या आईच्या सांगण्यावरून आनंदी त्यांच्या आयुष्यातून निघून जाते. मात्र ६ वर्षांनंतर ती कल्याणी म्हणून पुन्हा त्यांच्या आयुष्यात येते. सुखदामुळे आनंदी राजाध्यक्षांच्या घरात येते. मात्र आनंदीचे हे सत्य सुखदापासून लपून राहत नाही. सार्थकवर प्रेम करणाऱ्या सुखदाला कल्याणी हीच आनंदी आहे, हे कळते तेव्हा ती त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते आणि यात ती यशस्वीदेखील होते. अशारितीने पुन्हा एकदा सार्थक आणि आनंदी एकत्र येतात.