Join us  

'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्रा आणि दिपूचं लग्न, नवरदेवाचा लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:27 PM

Man Udu Udu Jhala: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खरेतर मन उडू उडू झालं या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला होता. झी मराठी वाहिनीवरची ही नंबर २ ची मालिका टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम १०च्या यादीत नाव नोंदवताना दिसली होती. इंद्रा आणि दिपूची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसली. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवट इंद्रजित आणि दीपूच्या लग्नाने होणार आहे.

बऱ्याच संघर्षानंतर देशपांडे सरांनी इंद्रजित आणि दीपूच्या लग्नाला परवानगी दिली आहे. गेल्या काही भागांपासून मालिकेत त्यांच्या लग्नाच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. आता या दोघांचे लग्न मालिकेत धुमधडाक्यात पार पडणार आहे. नुकताच इंद्रजितचा नवरदेवाचा लूक समोर आला आहे.

दाक्षिणात्य स्टाईल असलेल्या इंद्राच्या रॉयल लूकमुळे अजिंक्य राऊत भाव खाऊन जाताना दिसत आहे. तर लवकरच दिपूचा देखील नवरीचा लूक समोर आलेला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार मंडळी इंद्रा आणि दीपिकाच्या लग्नात नटूनथटून हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील कलाकारांनी नुकतेच मालिकेचे शूटिंग पूर्ण करून एकमेकांना निरोप दिला आहे.

या मालिकेच्या जागी येत्या काही दिवसात नवीन मालिका दाखल होत आहे. तू चाल पुढं’ ही नवी मालिका येत्या १५ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 
टॅग्स :झी मराठी