शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

रेल्वे दुपदरीकरण रद्द करा; विरोधकांचा विधानसभेत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 10:31 AM

हा मुद्दा विजय सरदेसाई यांनी प्रश्नकाळात उपस्थित करताना या प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात येणार याची माहिती मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रेल्वे दुपदरीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात आले असून, हे आश्चयकारक आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी करत विरोधकांनी काल विधानसभेत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाची स्थगिती नसलेल्या भागात या प्रकल्पासाठी काम चालू राहील या भूमिकेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम राहिले.

हा मुद्दा विजय सरदेसाई यांनी प्रश्नकाळात उपस्थित करताना या प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात येणार याची माहिती मागितली. त्यावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी एकूण ३ हजार चौरस मीटरहून अधिक जमीन संपादन करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, कर्नाटकात घाट भागात या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण दाखल्यामुळे स्थगिती दिली असल्याचे आमदार कार्लस फेरेरा यांनी सांगितले. घाट भागात जर या प्रकल्पाचे काम न्यायालयाने रोखले असल्यामुळे गोव्यात प्रकल्पाचे काम करून काय फायदा? घाट भागातून जोपर्यंत दुपदरीकरण जात नाही तोपर्यंत गोव्यातील दुपदरीकरणाला काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भू-संपादनाचे राज्य सरकारकडे असलेले अधिकार रेल्वेकडे का देण्यात आले आणि कोणाच्या सूचनेवरून देण्यात आले, असा प्रश्न केला. या प्रकरणात मोन्सेरात यांनी रेल्वेचा प्रकल्प असल्यामुळे रेल्वेकडूनच भू-संपादन केले जाईल, असे सांगितले.

विरोधक एकवटले

आमदार युरी आलेमाव, आमदार सरदेसाई, वेन्झी व्हीएगश, एल्टन डिकॉस्टा यांनी रेल्वेचे दुपदरीकरण हे मुरगाव बंदरातून कोळसा वाहतूक करण्यासाठी असल्याचा दावा केला. गोव्याला कोळसा नको असल्यामुळे प्रकल्पच रद्द करा, अशी त्यांची मागणी होती, जी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

दुपदरीकरण कोळशासाठी नव्हे : मुख्यमंत्री सावंत

रेल्वेचे दुपदरीकरण हे कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा दावा चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. गोव्याला कोळसा नको आहे, याची आपल्यालाही जाणीव आहे. मात्र, विरोधक कोळशासाठीच दुपदरीकरण करीत असल्याच्या दाव्यावर ठाम राहिले.

युरींनी वाचले 'ते' पत्र

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रेल्वे अधिकाऱ्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्रच विधानसभेत सादर केले. त्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी भू-संपादन राज्य सरकारकडून करून जमीन रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी, अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पत्र त्यांनी सभापतींना सादर केले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाKonkan Railwayकोकण रेल्वे